पञकार संरक्षण कायद्याचा बिलोली येथे जल्लोष

0
10

नांदेड /बिलोली,दि.8- येथिल तहसिल कार्यालयासमोर राज्य सरकारने पारित केलेल्या पत्रकार सरंक्षण कायद्याबद्दल आतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.पत्रकाराना अाव्हानात्मक काम करताना कायदेशीर संरक्षण मिळाले पाहीजे.विशेषता ग्रामीण भागात राजकारणी,पोलीस,विविध क्षेत्रात अवैध कामकरणाऱ्या संघटीत गुन्हेगारीमुळे पत्रकारावर होणारे जिवघेणे हल्ले चिंतेची बाब झाली होती.पत्रकाराना संरक्षण मिळाले पाहीजे या साठी पत्रकार हल्ला विरोधी समीतीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी या कायद्याची मागणी सातत्याने लावुन धरली होती.
पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा लागु करण्यास आनेकांचा तीव्र विरोध होता.अखील भारतीय पत्रकार संघाने सतत आंदोलन करून हा कायदा मंजूर करून घेण्यासाठी शासनावर दबाव आणला.राज्यात अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले पण हा कायदा मंजूर करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केल्याने बिंलोली पत्रकार संघाच्यावतीने त्यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे.जल्लोषाच्यावेळी वलीओद्दीन फारुखी ,सुनील कदम ,ए.जी कुरेशी ,लक्ष्मन शेटीवार, प्रा.मोहसिन खाँन, शेख फारुख ,शिवराज रायलवाड सूनिल जेठे, संजयकुमार पोवाडे ,प्रकाश पोवाडे राजु पाटील ,राजु कांबळे, रत्नाकर जाधव, इलियास फारुखी .सय्यद रियाज ,गणपत धर्मपुरे, प्रकाश फुगारे, वैभव घाटे ,मारोती मोतेवार , हनिफ इनामदार, बालाजी नरहारे , गौतम भालेराव आदी पत्रकार उपस्थित होते.