मुख्यमंत्र्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा

0
14

मुंबई, दि. 20 : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधातील शपथ दिली.यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी  व कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधात लढण्याची व समाजात शांती, सामाजिक एकोपा आणि टिकविण्याची,  तसेच मानवी जिवीत आणि मूल्य धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याचीही यावेळी शपथ घेतली.