• कृषी पंपाच्या चालू वीज देयकात 33.5 टक्के सूट दिल्याने 19,45,183 शेतकरी लाभार्थी, सुमारे 353 कोटी रूपये लाभ दिला.
• परीक्षा शुल्क माफी यातून शेतकरी कुटुंबातील सुमारे 9.5 लाख विद्यार्थ्यांना 40 कोटींचा दिलासा मिळाला आहे.
• गेल्या वर्षभरात सुमारे एक कोटीवर शेतकऱ्यांना 10,582 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत आजवरच्या इतिहासात मिळाली नाही, इतकी मोठी मदत शेतकऱ्यांना मिळाली.
• सुमारे 42 लाख शेतकऱ्यांना 1806 कोटी रूपये नुकसान भरपाई विम्याच्या माध्यमातून देण्यात आली
• नव्या आर्थिक वर्षात 82.57 लाख शेतकरी विम्याच्या कक्षेत आले.
• 61,23,259 शेतकरी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असून, आतापर्यंत एक लाख मेट्रिक टनाहून अधिक धान्य वाटप करण्यात आले आहे.
• राजीव गांधी जीवनदायी योजना जाहीर केल्यापासून आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये 24118 शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला.
• सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ.
• यापूर्वी केवळ 1 लाख रूपये नुकसान भरपाईपोटी मिळायचे आता त्याऐवजी 2 लाख रूपये मिळणार आहेत.
• राज्यातील 6200 गावांमध्ये जलयुक्त शिवारच्या विविध कामांच्या माध्यमातून 24 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला.
• जलयुक्त शिवार: आमदारांच्या अध्यक्षतेत तालुका पातळीवर समित्या स्थापन करणार.
• जलयुक्त शिवारसाठी आणखी पाच हजार गावांची निवड करण्यात आली, जनसहभाग देणाऱ्या गावांचा आणखी समावेश करणार.
• आता मागेल त्याला शेततळे.
• गेल्या वर्षीपेक्षा कर्ज मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 6.5 लाखांची वाढ, कर्जाच्या रकमेत 4129 कोटी रुपयांची वाढ.
• गेल्या वर्षांत 49 हजार विहिरी बांधण्यात आल्या यापूर्वी केवळ एका वर्षात 16 हजार विहिरी बांधल्या जायच्या.
• रोजगार हमी योजना: 2015-16 मध्ये आतापर्यंत 417.68 लाख मनुष्यदिन निर्मिती. यावर खर्च 1181.39 कोटी.
• 2015-16 या वर्षात26829 वीजजोडण्या अवघ्या आठ महिन्यात दिल्या. जून 2016 पर्यंत पेड पेंडिंग पूर्ण करू.
• रेमंडचा अमरावतीत नवा उद्योग. 1500 कोटींची गुंतवणूक, 10 हजार रोजगार निर्मिती होणार.
• मोर्शीत 100 एकर जागेवर संत्रा प्रक्रिया प्रकल्प, नोगा ब्रांड कायम ठेवणार.
• विदर्भातील दुग्धोत्पादन व दूध गुणवत्तावाढीसाठी नेस्लेचे सहकार्य करणार, भंडारा गोंदियात मोठ्या- गुंतवणुकीचा प्रस्ताव.
असा आहे 10 हजार 512 कोटींचा विशेष कार्यक्रम
दुष्काळामुळे बाधित 15 हजार 747 गावांमधील शेतकऱ्यांना मदत. यात बाधित 53 लाख 19 हजार शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरूपातही मदत : 7412 कोटी
(82 लाख शेतकऱ्यांना पीकविमा 2800 कोटी+ विमा नसलेल्या कापूस/सोयाबीन उत्पादकांसाठी 1034 कोटीसह)
जलयुक्त शिवार : 1000 कोटी
मागेल त्याला शेततळ्यांसाठी: 250 कोटी
(याशिवाय मार्च नंतरच्या कालावधीसाठी एकूण 2500 कोटी रुपये)
धान खरेदीसाठी प्रोत्साहनपर अनुदान 200 रूपये प्रतिक्विंटल: 100 कोटी
33 हजार विहिरींसाठी: 750 कोटी
विहिरींना वीज जोडणीसाठी इन्फ्रा : 1000 कोटी
एकूण : 10 हजार 512 कोटी
(टीप : या रकमेत शेततळेसाठी या वर्षातील रक्कम आहे.)