पुण्यातील ४ विद्यार्थ्यांचे अपहरण

0
12
वृत्तंसस्था
रायपूर ,दि.3- भारत जाेडाे अभियानाअंतर्गत सायकल प्रवासाला निघालेल्या पुण्यातील चार विद्यार्थ्यांचे नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या जगदलपूरजवळील बिजापूर ते बासागुडा या मार्गावरून अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. २० डिसेंबर राेजी पुण्यातील एका मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे हे विद्यार्थी प्रवासासाठी निघाले हाेते. १० जानेवारी राेजी त्यांना अाेडिशात पाेहाेचायचे हाेते.
पुण्यातील नेमक्या काेणत्या महाविद्यालयाचे हे विद्यार्थी अाहेत हे अद्याप स्पष्ट नसून, त्यांच्या अपहरणाच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडच्या गुप्तहेर खात्यातील अधिकारी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात अाहेत. छत्तीसगडमध्ये प्रवेश केल्यानंतर बिजापूरच्या बेदरे व कुटरूपर्यंत ते पाेहाेचले हाेते.