यवतमाळ प्रकरणातील दोषीवर कारवाई हवीच-धनंजय मुंडे

0
6

विशेष प्रतिनिधी
बुलडाणा,दि.04- यवतमाळ येथील वायपीएस संस्थेत घृणास्पद प्रकार उघडकीस आल्यावर स्वतः यवतमाळ चे पोलीस अधिक्षक यांना तात्कळ कारवाई करण्यास सांगितले होते , मात्र त्यांनी तात्कळ कारवाई केली नाही. त्यामुळेच यवतमाळच्या जनतेचा उद्रेक झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.ते बुलडाणा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते.मुंडे यांनी संस्था ही मोठ्या व्यक्तीची असल्याने पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचेही म्हटले आहे.या घटनेनंतक आता तर ४- ५ वर्षांपूर्वी पास झालेल्या शाळकरी मुलींनी सुद्धा तक्रारी केल्याने याप्रकरणाची गंभीरता वाढली असून सरकार आणि पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेऊन संस्थेमधील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.