राज्यात अशी घटना घडणे शरमेची गोष्ट-पवार

0
6

मुंबई – मुंबई – दिल्लीतील निर्भयासारखी बलात्कार व हत्येची घटना राज्यात घडणे ही शरमेची गोष्ट आहे. कोणत्याही नराधमाची बलात्कार करण्याची हिंमत होणार नाही, असा कायदा राज्यात करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.
राज्यातील आया-बहिणीकडे वाकडी नजर टाकायची कोणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे, अशी दहशत निर्माण करणारा कायदा करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आज कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणावरील चर्चेने सुरुवात झाली. विरोधकांनी स्थगन प्रस्ताव आणून कोपर्डी येथील बलात्कारावर चर्चेची मागणी केली आहे.

13 जुलै रोजी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी जनक्षोभ उसळला आहे. याचे पडसाद विधानमंडळातही पडले. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांनी हा गंभीर मुद्दा असून स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा व्हायलाय हवी अशी भूमिका घेतली.

मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले
मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी याबाबत निवेदन दिल्यानंतर विरोधकांनी चांगलेच रान पेटवले. केवळ निवेदन देऊन संपवण्यासारखा हा विषय नसून चर्चा करुन कठोर कायदा व्हायला हवा, अशा शब्दात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले.

विधानपरिषदेत स्थगन प्रस्ताव
विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेनी स्थगन प्रस्ताव सादर केला.