काँग्रेस म्हणाली- 90 च्या दशकातही अशी स्थिती नव्हती

0
6

वृत्तसंस्था
नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. कोणतेही विधेयक सादर होण्यापूर्वी काश्मीर हिंसाचारावर चर्चा सुरु झाली. काँग्रेसने राज्यसभेत पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मीरची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशी स्थिती तर 1990 मध्ये देखील नव्हती. दहशतवादाविरोधात आम्ही सरकारसोबत आहोत, मात्र काश्मीरमध्ये सामान्यांना लक्ष्य केले जात आहे.
जीएसटीवर नजरा
सरकारचा प्रयत्न आहे की या अधिवेसनात वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयक कोणत्याही परिस्थितीत सर्व संमतीने मंजूर केले जाईल. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीसंबंधीचा घटनाक्रम, काश्मीरमधील हिंसाचार महागाईच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पुन्हा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
अधिवेशनाच्या सुरुवातीला मोदी म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. सगळ्यांचा मूड चांगला आहे, आशा आहे की अधिवेशनातही चांगले निर्णय होतील. देशाला नवी दिशा देण्याचे काम संसदेच्या या अधिवेशनात होईल.’