जलयुक्त शिवार ही लोकसहभाग मिळालेली यशस्वी योजना-मुख्यमंत्री फडणवीस

0
9

औरंगाबाद,दि.29,- जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात तसेच मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साठे निर्माण झाले असून राज्यामध्ये जलयुक्त
शिवार ही लोकसहभाग मिळालेली सर्वांत मोठी योजना असल्याचे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.ते फुलंब्री येथे जलयुक्त शिवार योजनेतगंत लोकसहभागातून झालेल्या फुलमस्ता नदी
खोलीकरण कामांचे जलपुजन प्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे,कामगार,भूकंप पुनवर्शसन कौशल्य विकास ,माजी सैनिक कल्याण विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,खा.रावसाहेब दानवे,विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट,जिल्हावधकारी डॉ. निधी पांडेय,एकनाथ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की शासनाने राज्य पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी ही योजना सुरु केली.2019 पर्यंत राज्यातील पाणी टंचाई दूर करणाचे उविष्ट ठेवले असून राज्यात 20 हजार गावापैकी 4 हजार 500
गावे जलयुक्त झाली आहेत. या अभियानासाठी राज्यातील तज्ञ लोकाचे मार्गदर्शन मिळत असून हे अभियान सर्वत्र यशस्वी होत आहे.
गावातील सर्व लोक एकत्र येऊन लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियानात प्रभावीपणे सहभाग नोंदवीत आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यात जलस्वातंत्र्याची क्रांती होत आहे. यामुळे मराठवाड्यात
परिवर्तन घडून येत असून पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींना डिजीटल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मंत्रालयस्तरापर्यंत जोडली जाईल. 17 हजार शाळा डिजीटल झाल्या असून सर्व शाळा डिजीटल स्वरुपाच्या करण्यात येतील.
जिल्हावधकारी डॉ. निधी पांडेय यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानसभा अध्यक्ष श्री बागडे यांच्या उपस्थितीत फुलंब्री नहरालगत असलेल्या फुलमस्ता नदीचे जलपुजन करण्यात आले.