पोलिसांवर हल्ले करणा-यांना शिक्षा झालीच पाहिजे – उद्धव ठाकरे

0
19

मुंबई, दि. ७ – राज्यातील पोलिसांवर होणा-या हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसत असून पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतर कल्याणमध्ये पुन्हा खाकी वर्दीवर हात उचलण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकालाच बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ‘ ज्यांच्यावर इतरांच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्यावरच हल्ले होतान दिसत असून कायद्याच्या रक्षमकर्त्यांनाच आता सुरक्षा देण्याची’ वेळ ओढावली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिस कुटुंबियांसह बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिसांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सुमारे तासभर झालेल्या या बैठकीत उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयावर चर्चा केली.