मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांचे निधन

0
10

मुंबई, दि. २७ – मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांचे रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुला असा परिवार आहे.

१९७७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सय्यद अहमद हे तब्बल पाच वेळा मुंबईतील नागपाडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले होते. २०११ मध्ये झारखंड व त्यानंतर २०१५ मध्ये मणिपूरच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.