हिंदूच्या भावना दुखावत असल्यास गोहत्या थांबली पाहिजे – फारूख अब्दुल्ला

0
10
वृत्तसंस्था
श्रीनगर, दि. १८ – गोहत्या केल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असतील तर गोहत्या करणं थांबलं पाहिजे असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. देशासह काश्मीरमध्ये गोहत्या व बीफबंदीवरून वाद चिघळलेला असतानाच नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला यांनी प्रथमच या विषयावरील आपले मौन सोडले असून त्यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.
विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख असून सर्वांचा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे गोहत्या थांबवली गेली पाहिजे असे जर हिंदू समाजातील नागरिकांना वाटत असेल तर त्यांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे आणि गोहत्या थांबली पाहिजे, असे फारूख अब्दुल्ला यांनी म्हटले.