नीट परीक्षा कायम – सर्वोच्च न्यायालय

0
9

नवी दिल्ली, दि. 9- देशभरातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेल्या नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला आहे. नीटची परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याचे आदेश नीटसंदर्भातल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. विद्यार्थी नीट 2ची परीक्षा देऊ शकतात, देशभरातले मेडिकल प्रवेश नीट परीक्षेनुसारच होणार असून, राज्यांना वेगळी सीईटी घेण्यास कोर्टानं मनाई केली आहे. तसेच नीट परीक्ष देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 24 जुलैला संधी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.