एलआयसीच्या मालमत्तेत 10 हजार कोटींची वाढ

0
10

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अर्थात एलआयसीच्या मालमत्तेत रु.10,000 कोटींची वाढ झाली आहे. वाहन कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात एलआयसीच्या मालमत्तेत रु. दहा हजार कोटींची भर पडली आहे. एलआयसीने मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, आणि हीरो मोटोकॉर्प या आणि बजाज ऑटो या वाहन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. 1 एप्रिल 2016 पासून आतापर्यंत केलेल्या गुंतवणुकीत 32 टक्के म्हणजेच रु.42000 कोटींची वाढ नोंदवण्यात आली आहे.

एलआयसीने मार्च 2016 मध्ये शेअर बाजारात रु.5,95,389 कोटींची गुंतवणूक केली होती. भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शिवाय भारतभर चांगल्या मॉन्सूनमुळे उत्साहाचे वातावरण आहे. परिणामी शेअर बाजारात देखील तेजीचे वातावरण कायम आहे.
एलआयसीने वाहन कंपन्यांमध्ये गुंतवलेल्या कंपन्यांपैकी टाटा मोटर्स सोडता महिंद्रा अँड महिंद्रा, आणि हीरो मोटोकॉर्प या आणि बजाज ऑटो या चारही कंपन्यांचे शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी पातळीजवळ पोचले आहे.