योग्य वेळी लालू, राहुल गांधींना चोख उत्तर देईन – नितीश कुमार

0
5

पाटणा, दि. 17 – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत त्या सर्व आरोपांना मी योग्य वेळी उत्तर देईन असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले. त्यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे हित लक्षात घेऊनच आपण भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या आरोपासंबंधी नितीश कुमारांना पत्रकारांनी विचारले त्यावेळी त्यांनी योग्यवेळी उत्तर देऊ असे सांगितले. बिहारचा विकास आणि न्याय यांना आपले पहिले प्राधान्य असेल असे नितीश म्हणाले. बिहारची जनता आणि बिहारच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मी बिहारची सेवा करत राहीन असे ते यावेळी म्हणाले.
दरम्यान याआधी लालूप्रसाद यादव यांनी पत्रकार परिषद घेत नितीश कुमार यांच्यावर सडेतोड टीका केली.