मुंबई दि.30:- ”भाजप ही खोटारड्यांची पार्टी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतापेक्षा विदेशात अधिक राहतात. त्यांच्या विजयाचे श्रेय त्यांच्या पेक्षा राहुल गांधी यांना अधिक आहे”, अशी कडवट टीका लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) चे प्रमुख राज ठाकरे यांनी केली.
राज म्हणाले, ”भाजपे लोकांना खोटे आश्वासने दिली. त्यामुळे ते सत्तेत आलेत. मात्र, बीफ आणि बुलेट ट्रेन सारख्या मुद्दयांमुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. ‘अच्छे दिन’ येणार अशी भूलथाप त्यांनी दिली. मात्र, अच्छे दिन केवळ मोदी सरकारमधील मंत्र्यांचे आले आहेत,” असे ते म्हणाले.