आरक्षणाच्या वक्तव्यावरून मतदारांमध्ये भीती- पासवान

0
6

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ,दि १९ – बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या आरक्षणाच्या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये भीती निर्माण झाल्याचे मत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांनी केले आहे. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला बिहार विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. “संघप्रमुखांच्या आरक्षणावरील वक्तव्यामुळे बिहारमधील मतदारांमध्ये भीती पसरली‘ असे पासवान यांनी म्हटले आहे. तसेच “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक स्वतंत्र संस्था आहे. मात्र ते ज्या संदर्भाने बोलले त्यामुळे मागासवर्गीय आणि प्रगत वर्गामध्ये फूट पडण्याची भीती मतदारांना वाटली‘, असेही ते पुढे म्हणाले. मात्र, संघप्रमुखांवर टीका करताना पासवान यांनी सावध पवित्रा घेतला.