आमच्या मिशांना खरकटे लागायचे कारण नाही; राजू शेट्टींवर सदाभाऊंचा पलटवार

0
14
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या आणि एक प्रकारचे शीतयुद्ध सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये सदाभाऊ खोत यांनी शेट्टी यांच्या आरोपांवर पलटवार केला. खा.राजू शेट्टी यांनी एका सभेत बोलताना आमच्या मिशांना कोणाचे खरकटे लागलेले नाही असा आरोप अप्रत्यक्षपणे सदाभाऊ यांच्यावर केला होता.

‘कोणाला तरी बरे वाटावे म्हणून मी काम करत नाही. मी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे.’ असेही सदाभाऊंनी ठणकावून सांगितले.‘सदाभाऊ राजपुत्राच्या घरात जन्माला आलेला नाही. मी इथे आलेलो आहे ते लाठ्याकाठ्या खाऊन. त्यामुळे आमच्या मिशीला खरकटं लागलेले आहे असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी नाकाला रुमाल लावून घ्यावा. आम्ही आमच्या मिशा पुसून स्वच्छ जाऊ’ अशा शब्दात सदाभाऊंनी राजू शेट्टींना उत्तर दिले आहे.‘मी आत्मक्लेश यात्रेपासून लांब राहावे असे राजू शेट्टी यांना वाटत असेल तर हरकत नाही. मी मळलेल्या वाटेवरुन चालणारा कार्यकर्ता नाही. सदाभाऊ स्वतःची वाट स्वतः निर्माण करतो.’  असे म्हणत सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना उत्तर दिले आहे.