नरेंद्र मोदींपेक्षा अडवाणी चांगले म्हणण्याची वेळ : जयराम रमेश

0
16
पुणे, दि.26  –  ”काँग्रेसचा यापूर्वीही पराभव झाला होता.  पण आम्ही पुन्हा सत्तेवर आलो.  त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे उदारमतवादी सभ्य प्रतिस्पर्धी होते.  आता मात्र मोदी यांच्यापेक्षा अडवाणी चांगले असे म्हणण्याची वेळ आली आहे.  मोदी यांना कशाचेही विधीनिषेध नाही.  मेरा भाषण मेरा शासन असा त्यांचा खाक्या आहे, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केली.
पुणे शहर काँग्रेसने मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारर्कीदीचा पंचनामा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयराम बोलत होते. काँग्रेस त्यांचा सामना करण्यात कमी पडत आहे, असेही रमेश यांनी यावेळी मान्य केले.