गंजगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकी मध्ये वैभव घाटे विजयी

0
17

नांदेड (सय्यद रियाज ),दि.05- बिलोली तालुक्यातील गंजगाव येथे 2015 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत साविञाबाई माधवराव घाटे या दोन प्रभागामधुन निवडुन आल्यामुळे त्यानी एका जागेचा राजीनामा दिला. त्या रिक्त झालेल्या जागेसाठी 27 मे रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल 29 मे रोजी जाहिर झाला.त्यामध्ये सरपंच सुपुञ वैभव माधवराव घाटे हे बहुमताने विजय झाले. निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी हा निकाल जाहीर केला. बिलोली तालुक्यातील गंजगाव येथिल सरपंच  साविञाबाई माधवराव घाटे 2015 च्या निवडणुकी मध्ये वार्ड क्र. 1 व वार्ड क्र.3 या दोनीही ठिकानाहुन बहुमताने विजय झाल्या होत्या .  बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी नवनाथ वगवाड यांनी केलेल्या मतमोजणीत वैभव माधवराव घाटे यांना 216 मते तर गौराबाई गायकवाड यांना 91 मध्ये आणी दिलीप घाटे यांना 1 मत मिळाले आहे. तर नोटाला तिन मते मिळुन पञकार वैभव माधवराव घाटे यांनी बहुमताने विजय झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिकारी वगवाड यांनी केली आहे.