शरद पवारांनी हाणला अणूकराराला विरोध करणा-या सेनेला टोला

0
8

मुंबई,- जैतापूरच्या प्रकल्पाला सत्ताधारी शिवसेनेचा विरोध कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तसेच सत्तेत असताना सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवणं चुकीचं असल्याचे सांगत त्यांनी शिवेसेनेला टोला हाणला आहे. तारापूर वीज केंद्रामुळे पर्यावरणाला कुठलीही हानी पोचली नाही, उलट राज्याला स्वस्त मिळत असल्याचे उदाहरण देत जैतापूर प्रकल्पामुळेही पर्यावरणाला कुठलीही हानी पोचणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपा- सेनेचे युतीचे सरकार असल्याने भाजपाने शिवसेनेला समजावून सांगायला हवे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

CMचा शिवसेनेला टोला

शिवसेनेच्या जैतापूर प्रकल्पविरोधी भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून पंतप्रधानांनी देशाच्या हिताचाच करार फ्रान्सशी घडवूण आणला आहे. त्यामुळे कुणीही त्याला विरोध करण्याचे कारण नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.
गेल्या काही काळापासून रखडलेल्या कोकणातील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या पूर्तीच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाला वेग देणाऱ्या महत्त्वपूर्ण करारावर पंतप्रधान मोदी व फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई होलांद यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला तीव्र विरोध असतानाही मोदी यांनी हा करार केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे