औरंगाबाद ,दि.२७- केंद्र आणि राज्यामध्ये एकापाठोपाठ एक भाजपाच्या मंत्र्यांची विविध प्रकरणे बाहेर येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इतक्या लवकर भाजपवर अशी वेळ येईल अस वाटल नव्हत अस मत व्यक्त करुन नेमक्या शब्दांमध्ये भाजपाचा समाचार घेतला.
भाजपकडून विरोधक आणि प्रसारमाध्यमांना इतक्या मोठया प्रमाणावर खाद्य मिळेल अस वाटल नव्हत असा टोमणा त्यांनी भाजपला लगावला. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज पुरोहित यांच्या स्टिंग ऑपरेशनच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत खदखद, असंतोष समोर आला आहे. यावरुन पक्षाची दिक्षा स्पष्ट होते अस पवार म्हणाले.
केंद्रात भाजपाकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे लोकसभेच्या पुन्हा निवडणूका होण्याची शक्यता नाही मात्र राज्यात काय होईल ते सांगता येत नाही अस सूचक विधान पवारांनी यावेळी केले. पंकजा मुंडे यांच्यावरील चिक्की घोटाळयाच्या आरोपावरुन विरोधकांनी भाजपाला कोंडीत पकडलेले असताना शरद पवारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.