BCCI अध्‍यक्षपदी शशांक मनोहर यांची निवड निश्‍चित

0
12

मुंबई दि. २९ – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI)विशेष सर्वसाधारण बैठक 4 ऑक्‍टोबरला मुंबईमध्‍ये होणार आहे. या बैठकीत बोर्डांच्‍या नवीन अध्‍यक्षांची निवड केली जाणार आहे. उमेद्वारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर आहे.20 सप्‍टेंबरला जगमोहन दालमिया यांचे निधन झाल्‍यानंतर BCCI चे अध्‍यक्षपद रिक्‍त झाले होते. तथापि, अध्यक्षपदी शशांक मनोहर यांची निवड होण्‍याचे निश्‍चित झाले आहे.
शशांक मनोहर यांना BCCIचे सचिव अनुराग ठाकुर आणि शदर पवार यांचा सपोर्ट मिळाला आहे. शशांक मनोहर 2008 ते 2011 पर्यंत BCCI अध्‍यक्ष राहिलेले आहेत. सुत्रांच्‍या माहितीनुसार शरद पवार यांच्‍या समर्थनानंतर त्‍यांचे पदभार सांभाळणे निश्‍चित झाल्‍यासारखे आहे. त्‍यामुळे मनोहर यांना आता 29 पैकी 15 मते मिळणे निश्‍चित झाले आहे.