भारत – पाकिस्तान सामना रद्द होण्याची भीती

0
6
वृत्तसंस्था
कोलकाता, दि. १९ – कोलकात्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असल्याने क्रिकेटरसिकांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. ईडन गार्डनवर संध्याकाळी 7.30 वाजता भारत – पाकिस्तान टी-२० सामना सुरु होणार आहे. मात्र पाऊस सुरु असल्याने सामन्यासाठी उत्सुक असलेल्या क्रिकेट रसिकांचा पावसामुळे हिरमोड होण्याची शक्यता आहे. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाच्या सरी अजून थांबलेल्या नाही आहेत.
सकाळपासूनच कोलकात्यातील वातावरण ढगाळ झाले असूनअधुनमधून पावसाच्या सरीही कोसळत आहेत. दिवसभर हीच परिस्थिती कायम राहू शकते वा वीजांच्या कडकडाटासाह आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली होती. पाऊस न थांबवल्या सामना रद्द होण्याचं संकट आहे. तर दुसरीकडे कमी षटकांचा सामना खेळवला जाईल अशीही शक्यता आहे.