मुंबई, दि. १० – मुंबई उच्च न्यायालयाने २००२ मधल्या हिट अँड रन प्रकरणी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपांमधून सलमान खानला मुक्त केले पण त्यांनंतर महाराष्ट्र सरकारने सलमान विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार होते पण त्यापुर्वीच आज सलमानच्या अडचणीत वाढ झाली आहे. हिट अँड रन प्रकरणी या दुर्घटनेतील पीडित नुरुल्ला शेखच्या कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेख कुटुंबियांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून १२ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.