जबलपूरमधील अपघातात सडक अर्जुनी तालुक्यातील 11 जणांचा मृत्यू

0
10

तेंदुपान तोडण्यासाठी जबलपूरच्या भातोईला चालले होते

गोंदिया,दि.11(berartimes.com) -गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव(डव्वा),बोथली व घाटबोरी येथील 11 जणांचा मध्यप्रदेशातील जबलपूर जवळील जमुनिया गावाजवळ गुरुवारच्या रात्री दोन वाजता झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.या अपघातात 15 जण जखमी झाले असून यापैकी चौघांची परिस्थिती चिंताजनक आहे.जखमीवर जबलपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.मृतामध्ये पळसगाव येथील लक्ष्मीकांत कुवरलाल चौधरी,बुधराम,लखुजी राऊत,रामनाथ गणपत सोरते,तुलाराम हरीचंद भोयर,प्रदिप भाऊराव राऊत(वय 15) व चुन्नीलाल दयाराम चौधरी.तर बोथली येथील भुमेश्वर दयाराम भोयर व  संतू  दामा शेंडे (53,रा.बोथली) 2 व घाटबोरी येथील छगण निलकंठ काबंळे(रा.घाटबोरी कोहली),शंकर रामकृष्ण मरसकोल्हे व गणेश तेजराम दखने(रा.सिंदीपार) यांचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त असे की,गोंदिया येथील तेंदुपत्ता व्यवसायिकांने मध्यप्रदेशातील जबलपूर भागातील जंगल तेंदुपान तोडण्यासाठी खरेदी केले होते.ती पाने तोडण्यासाठी जबलपूरला  20 ते  26 व्यक्ती हे तेंदुपत्ता तोडण्यासाठी जबलपूरला पोचले होते.ते गोंदियावरुन जबलपूरला रात्रीला रेल्वेने पोचले.तेथून वनविभागाच्या पिकअप गाडीने तेंदूपत्ता तोडण्यासाठी चरगंवा येथे जाण्यासाठी निघाले असता वाहनचालकाचे पिकअप वाहनावरील नियत्रंण सुटल्याने पुलाचे रेंलिंग तोडत 25 फुट पुलाखाली नदीत वाहन कोसळले.याघटनेत 10 जणांचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर 15 व्यक्ती हे जखमी झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्वरीत पोलीसांनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना जबलपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.उपचरानंतर 11 जखमींना डिस्चार्ज करण्यात आले असून 4 गंभीर जखमीवर अद्यापही उपचार सुरु आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने ज्या तेंदुपत्ता कंत्राटदाराला वाहन दिले होते.त्या कंत्राटदाराचा वाहनचालक हा दारुच्या नशेत वाहन चालवित होता.या दरम्यान  नरसिंहपुर-गोटेगांव मार्गावरील जामुनिया जवळील एका वळणरस्त्यावर ड्राइवरचे गाड़ीवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पुलाचे रेलिंग तोड़त सरळ खाली पडले.मृतक व जखमींच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन मध्यप्रदेश सरकारच्यावतीने देण्यात आले असून घटनेनंतर गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीसांना घटनेची माहिती त्वरीत कळविण्यात आली.डुग्गीपार पोलीसांनी संबधिताच्या गावी जाऊन झालेल्या अपघाताची माहिती क्षणाचाही विलंब न लावता दिली.

या अपघातातील जखमीमध्ये बाबुराव चितांमन मेश्राम,नरेश नेतराम भोयर,हरिचंद्र रमेश भोयर,कोंडू गजभिये सर्व बोथली,विलास नामदेव हल्वी,भुनेश्वर रामदास सोनवाने,भाऊराव सदाराम हलवी,जयपाल श्रीराम हलवी,रविंद्र तेजराम हलवी,भोजराज चिंतामण हलवी,हर कालीराम चेम्पू चकटे.हुलींचद दसरु कोलारे,देवाजी कारु भोयर,मारुती अर्जुन कोल्हारे,चुन्नीलाल लक्ष्मण शेंडे व त्रिमुर्ती अमित बसोंड यांचा समावेश आहे.पळसगाव व बोथली येथील मृतावंर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी दिली आहे.त्यासाठी सामुहिक अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु करण्यात आली असून परिसरात शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर व इतर सहकारी जखमी व मृतकांच्या कुटुंबाना सर्वतोपरी मदत मिळावी.तसेच ज्या तेंदुपत्ता कंत्राटदाराने त्यांना पाठविले होते,त्यांनी आर्थिक मदत तत्काळ करावी अशी मागणी केली आहे.