वीज पडून सख्खे भाऊ दगावले

0
15

नांदेड,दि.03- नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुकयात कुंटुर शिवारात आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास वीज पडून उकळीमाळ येथील दोन शेतमजूर भावांचा भुईमुगांचे कांड जमा करताना जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांची नावे गंगाधर गोविंद मुदुंगे (वय 22) व शिवाजी गोविंद मुदुंगे (वय 18) अशी आहेत. तर  शेतमालक नागोराव बकवाड सह अन्य एकजण जखमी असून त्यांच्यावर नादेंडच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो.नि.विवेकानंद पाटील व जमादार बालाजी गीते,काॅस्टेंबल महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला.तसेच नायगाव तहसिल कार्यालयाच्या कर्मचा-यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गंगाधर म्रदुंगे यांचे लग्न काही महिन्यापुर्वीच झाले असून पत्नी गर्भवती आहे.अशातच झालेल्या या नैसर्गीक आपत्तीने म्रुदुंगे परिवारावर शोककळा पसरली असून शेतकरी वर्गात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.