सुरक्षा रक्षकांनी केला तीन दहशदवाद्यांचा खात्मा

0
3

श्रीनगर – तीन दहशतवाद्यांचा जम्मू काश्मिरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत खात्मा केला आहे. सुरक्षा रक्षक आणि दहशदवाद्यांमध्ये बारामुल्ला आणि सोपोर या जिल्ह्यात चकमक झाली होती.

सुरक्षा रक्षकांना बारामुल्ला जिल्ह्यातील एका गावात तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मोहिम दहशदवाद्यांवर हल्ला करण्यात आला. त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला आहे. तर इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच सोपोर जिल्ह्यातील ठाक-गुंड गावातही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. याठिकाणीही पोलिसांच्या मदतीने सुरक्षा रक्षकांनी शोधमोहिम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या दिशेने केलेल्या गोळीबारामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये लष्कर ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या दोन्ही चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही.