निवडणुकांच्या तोंडावर मोदींची शेतकऱ्यांना खूशखबर!

0
14

नवी दिल्ली,दि.05(वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खूश करण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. सरकारने २०१८-१९ वित्तीय वर्षासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) भरघोस वाढ जाहीर केली आहे. भाताच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीला जेमतेम एक वर्ष असताना त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे.म्हणजे 2019 च्या निवडणुका लक्षात घेऊनच ही घोषणा असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींविषयक समितीने हा निर्णय घेतला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकºयी अस्वस्थ व संतप्त आहेत. महाराष्ट्रात आधारभूत किमत वाढवून देण्यासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये शेतकरी संपही झाला होता. सरकारच्या आजच्या निर्णयामुळे शेतकºयांना दिलासा
मिळेल. हमीभावाच्या आश्वासनाची पूर्ततेसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
भाताच्या किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटलला १५५० वरून १७५० रुपये करण्यात आली आहे. कापसाची किंमत प्रति क्विंटल ४०२० रुपयांवरुन ५१५० (मध्यम धागा) व ४३२० रुपयांवरुन ५४५० रुपये (लांब धागा) करण्यात आली आहे. डाळींची किंमत क्विंटलला ५४५० वरून ५६७५ रुपये करण्यात आली आहे. मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी १४ पिकांच्या एमएसपीतही सुमारे ५0 ते ९६ टक्के वाढ केली आहे.