काश्मीरमध्ये ३ दहशतवाद्यांना लष्कराने घातले कंठस्नान

0
11

वृत्तसंस्था
श्रीनगर, दि. ६ – उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सीमेपलिकडून घुसखोरीचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावत, सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) तीन दहशतवादी भारतीय हद्दीत घुसत होते. सुरक्षा रक्षकांनी हा घुसखोरीचा कट उधळून लावण्यासाठी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सीमेपलिकडून गेल्या दोन आठवड्यांत तिसऱ्यांदा दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. पण, सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करू शकलेले नाहीत.