पांढरकवडा येथे दोन शेतकर्याची आत्महत्या

0
8

यवतमाळ,दि.6- जिल्ह्यातील शेतकयाना चांगले दिवस येण्याचे गाजर युती सरकारने दाखविले होते.परंतु केंद्रात सत्ता येऊनही शेतकरी समस्येचे निराकारण निघाले नाही.100 दिवसात शेतकरी आ्त्महत्येचा प्रश्न मार्गी लावू असे सांगणारे पंतप्रधान सुध्दा शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरल्याचे जिल्ह्यातील दोन शेतकर्यानी आज केलेल्या आत्महत्येवरुन दिसून आले.पांढरकवडा येथील शेतकर्यानी सरकारला जबाबदार धरत यवतमाळ जित्ह्यातील पांढरकवडा येथील दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. पॅकेजचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या करावी लागत असल्याचे या शेतक-यांनी मागे ठेवलेल्लिया चिठीत लिहिलेले आढळले.त्यामुळे केंद्र व राज्यातील सत्ताधारी शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याचेच चित्र आहे.