वलनी गावावर कोसळले विसर्जनाचे विघ्न

0
7

पवनी,दि. २८ शाळा शिकणाऱ्या सवंगड्यांनी बालहौस म्हणून गणपतीची स्थापना केली. त्याची दहा दिवस मोठ्या श्रध्देने आराधना केली. मात्र, नियतीला त्यांची आराधना मान्य नव्हती. विसजर्नाच्या दिवशीच दोन चिमुकल्या बालकांवर काळाने झडप घातली. याप्रसंगामुळे वलनी येथील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील वलनी (चौ.) येथील गांधी विद्यालयात शिकणारे दोन शालेय विद्याथी समीर मनोज जनबंधू (१४) गौरव संदीप मेश्राम (१२) असे मृतक बालकांचे नाव आहेत. गणपती विसर्जनासाठी वलनी घाटावर बालमित्र गेले असता बुडून दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती होताच गावातील आबालवृध्दांनी नदी घाटाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. या घटनेमुळे जनबंधू व मेश्राम कुटुंबावर मोठा आघात झाला.