विरोधकांना केवळ वाढदिवस साजरे करण्यात रस- एकनाथ खडसे

0
8

नागपूर, दि. ११ –विरोधकांनी सलग अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी देखील कामकाज चालू दिलं नाही. सभागृहात गोंधळ घातला. शेतक-यांचे प्रश्न सुटण्यात त्यांना रस नाही, अशी टीका कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.

विरोधकांना शेतक-यांचे प्रश्न सुटण्यात रस नाही तर मोर्चे करण्यात आणि वाढदिवस साजरे करण्यात जास्त रस आहे. वाढदिवस साजरे झाल्यावर ते सभागृहात येतात आणि केवळ गोंधळ करतात. त्यांना फक्त राजकारण करायचं असतं. आम्ही सतत चार दिवसांपासून अजित पवार, धनंजय मुंडे यासारख्या विरोधी पक्षातील मंडळींना कामकाजामध्ये सहभागी होण्याची विनंती करत आहोत. विरोधी पक्षाने स्वतः चर्चेचा प्रस्ताव दिला होता पण आता तेच चर्चेस तयार नाहीत.

पाच दिवस अधिवेशनाचे कामकाज विरोधकांनी चालू दिले नाही. त्यामुळे करोडोंचे नुकसान होत आहे. जनतेचे पैसे पाण्यात जात आहे, अशीही टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली.