आमीर खानने केलं श्रमदान

0
11

अमरावती-पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते वाटर कप’ स्पर्धेच्या निमित्ताने बॉलीवूड सिने अभिनेता आमीर खान आज अमरावतीत आला.अमरावतीच्या वरुड तालुक्यातील वाठोडा गावात आमिरने श्रमदान केलं.सकाळी सहा वाजता सुरु झालेल्या या श्रमदानात गावकऱ्यांसह अभिनेत्री रीमा लागू,सई ताम्हणकर, अभिनेता सुनील बर्वे,आमदार सुनील बोंडे आदी उपस्थित होते. पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाटर कप स्पर्धेत अमरावतीच्या वरुड तालुक्याची निवड करण्यात आली आहे.वरुडच्या वाठोडा गावात आलेल्या आमिरने यावेळी आपल्या सहकाऱ्यांसह श्रमदान केलं.श्रमदान झाल्यानंतर आमीर खानने गावकऱ्यांशी संवाद साधला व गावात सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली.