अपघातात गुजरातमधील तिघांचा, तर मध्यप्रदेशातील दोघींचा मृत्यू

0
8

अकोला, दि. २९ : टॅँकरने कारला चिरडल्याने चिमुकलीसह पाच जण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर ते तरोडा फाट्यादरम्यान रविवारी दुपारी घडली. अपघातात गुजरातमधील तिघांचा, तर मध्यप्रदेशातील दोघींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे.एमएच-४६-एफ-०५४२ या क्रमांकाचा टॅँकर बाळापूर येथून खामगावकडे जात होता. टॅँकरने विरुद्ध दिशेने येत असलेल्या डीडी-०३-इ-२९०६ या क्रमांकाच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील पाच जण ठार झाले. गुजरातमधील वापी येथील चतुर्भूज मुरलीधर कारंजावाला (वय ४५ ), संगीता चतुर्भूज कारंजावाला (वय ४०) आणि यश चतुर्भूज कारंजावाला (वय २०) यांच्यासह बऱ्हाणपूर येथील रंजना मन्नूभाई नागर (३५) आणि आयना मन्नूभाई नागर (वय ६) हे मृत्युमुखी पडले.