लेखणीबंदच्या नावावर कार्यालय सोडून कर्मचारी गेले फिरायला

0
7

गोंदिया,दि.१८-महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्यात १५ जुर्लेपासून लेखणी बंद आंदोलन सुरु करण्यात आले.शेजारील भंडारा जिल्ह्यातही १५ जुर्लेपासून आंदोलनाला सुरवात झाली.पण गोंदियात मात्र १८ जुर्ले रोजी हे आंदोलन सुरु झाले ते सुध्दा भंडारा येथील काही पदाधिकारी आल्यानंतर.लेखणीबंद आंदोलन म्हणजे कार्यालयात आपल्या जागेवर बसायचे आहे,परंतु कुठलेही काम करायचे नाही.परंतु आज जेव्हा गोंदिया जिल्हा परिषदेत लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले,त्यानंतर मात्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागासह काही विभागाकडे फेरफटका मारल्यावर विचित्र स्थिती बघावयास मिळाली.आंदोलनातील सहभागी सर्व कर्मचारी वर्ग आपल्या कार्यालयात दिलेल्या आस्थापनेवर बसायला मिळेल असी अपेक्षा होती,परंतु तसे दिसून आले नाही.सामान्य प्रशासन विभागाचेच सांगायचे झाले तर या विभागातील मेश्राम,अशोक केंद्रे,लिचडे,पळसकर,खोटेले,इनवाते आदी कर्मचारी हे कार्यालयातून चक्क नदारद होते.ते कार्यालय सोडून लेखणी बंद आंदोलनाच्या नावावर पंचायत समिती कार्यालयांना भेटी द्यायला गेले होते.जातांना त्यांनी आपल्या वरिष्ठांची परवनागी घेतली होती की नाही प्रश्न सध्या अनुत्तरीत असला तरी लेखणीबंद आंदोलनाच्या नावावर काम न करता पंचायत समितीला भेट द्यायला गेलेल्या कर्मचाèयांवर सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी कारवाई करतात की गप्प राहतात हे सुध्दा बघावे लागणार आहे.त्यातच भंडारा येथील सीईओनी तर चक्क लेखणी बंद आंदोलनात सहभागी कर्मचारी यांना काम नाही तर वेतन नाही असे पत्रच दिले आहे,तसेच पत्र गोंदियाचे सीईओ देतात की काय याकडे लक्ष लागले आहे.