शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

0
13

वर्धा, दि. १७ – आष्टी (श.) तालुक्यातील मोई येथील एका शेतकऱ्यावर त्या अस्वलाने पुन्हा हल्ला चढविला. यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर पवार (४५) रा. मोई असे जखमीचे नाव आहे. अस्वलाचा हा तिसरा हल्ला आहे. मागील काही दिवसांपूर्वी मोई व माणिकवाडा या दोन गावातील शेतकऱ्यांवर अस्वल व तिच्या दोन पिलांनी हल्ला चढविला होता.
१५ दिवसांपूर्वी अशाचप्रकारे एका शेतकऱ्यावर अस्वलाने दुसऱ्यांदा हल्ला केला होता. यामुळे संतप्त होऊन सुमारे २५०० नागरिकांनी वनाधिकाऱ्यांना चार तास वेठीस धरले होते. त्यानंतर वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोम्बिंग आॅपरेशन राबवून त्या अस्वलाची दहशत घालविण्याच्या तात्काळ सूचना वनविभागाच्या येथील अधिकाऱ्यांना दिल्या