कबीर मानव सेवा आश्रमातुन पालखी यात्रेला सुरुवात

0
17

गोरेगाव ता.२२:- संतानी सांगीतलेल्या मानवकल्याण मार्गाचा अवलंबन करुन जिवनातील शिखर गाठावे या उद्देशाने पालखी यात्रेचे आयोजन संत कबीर मानव सेवा आश्रमातुन नगराध्यक्ष सिमा कटरे यांच्या हस्ते विधिवत पुजा करुन काढण्यात आली.यावेळी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष जगदिश येरोला , बाबुलाल पटले, डॉ रुस्तम येळे , हिरालाल रहांगडाले, अरविंद जायस्वाल, मोरेश्वर कांबळे, सेवकराम अगडे, हि दा येळे, सुनील राऊत, डॉ अंकीता बिसेन, उमा बिसेन, पारबता अगडे, लिलाबाई उईके, दुर्गाबाई धपाडे, बि सी राऊत, योगराज चाचेरे, भिमेश्वर शरणागत उपस्थित होते.पालखी यात्रा ही मराठवाडा व पश्चिम महाराष्टाच्या भागात काढली जात असते पण विदर्भात पालखी काढण्याचे प्रकार कमी आहेत आज बालशिव सत्संग कबीर भजन मंडळाव्दारे पालखी यात्रा काढण्यात येत आहे याव्दारे मानवकल्याणाचा मार्ग दाखविण्यास सहकार्य मिळेल असे मार्गदर्शनात जगदिश येरोला यांनी म्हटले आहे नगराध्यक्ष सिमा कटरे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.सुत्रसंचालन निर्मलदास सोनवाने यांनी केले.