गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा मुख्यमंत्र्याकडे आ.अग्रवालांची मागणी

0
8

गोंदिया,दि.22-गेल्या काही वर्षाचा विचार केल्यास यावर्षीची परिस्थिती ही गोंदिया जिल्ह्यासाठी भयावह अशी ठरली असून आॅगस्ट महिना संपत अालेला असतानाही जिल्ह्यात पावसाने पाहिजे त्याप्रमाणात हजेरी न लावल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच जिल्ह्यातील रोवणीचे प्रमाण सुद्दा 35 टक्याच्या आत असल्याने आणि भविष्यात रोवणी होण्याची कुठलीच शक्यता नसल्याने सरकारने तातडीने गोंदिया जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा जाहिर करावा या मागणीचे निवेदन गोंदियाचे आमदार व लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी आज(दि.22)मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सादर केले.त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे जेष्ट नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुध्दा उपस्थित होते.