पाणीवाल्या बाबाचा अंनिसने केला भंडाफोड 

0
16

बुलडाणा,दि.21 :  केवळ आयुवेर्दिक पाणी ५६ प्रकारचे असाध्य आजार बरे होत असल्याचा दावा करणाºया पाणीवाल्या बाबाचा महाराष्ट्र अंनिसने शनिवारी सकाळी दहीद बु येथे जावून भंडाफोड केला. तसेच या बाबामुळे गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रारही पोलिसात देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील जातवा या गावातील अशोक नथ्थू पवार उर्फ जय हरी महात्मा अशोक माऊली महाराज  काही वर्षांपासून आयुर्वेदिक पाणी देवून रोग्यांवर उपचार करीत आहेत. एक महिन्यापासून बुलडाणा तालुक्यातील दहीद बु. या गावात जय हरी महाराज भाविकांना पाणी देवून उपचार करीत आहेत. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा परिसरात महाराज दर शनिवरी येवून भाविक व रूग्णांना पाणी देतात.  महाराजांकडून पाणी घेण्याकरिता राज्यभरातून हजारो भाविक दहीद गावात येत आहेत. शनिवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष आंबेकर, जिल्हा कोषाध्यक्ष नरेंद्र लांजेवार, जिल्हा सरचिटणीस पंजाबराव गायकवाड यांनी महाराजांनी भेट घेवून कशाप्रकारे उपचार करतात, याची माहिती जाणून घेतली. यावेळी महाराजांनी आयुवेर्दिक पाण्याव्दारे एड्स व कर्करोगही बरा होत असून, अनेकांना याचा फायदा झाला असल्याचा दावा केला आहे. तर अंनिसने हे सर्व थोतांड असल्याचा आरोप केला आहे. या शनिवारी संपूर्ण राज्यातून जवळपास ७ हजार भाविकांनी हजेली लावली. तसेच दर शनिवारी हजारो भाविक दहीद येथे येवून उपचार घेतात. महाराज भाविकांना मधूमेह व रक्तदाबाची औषधी देत असून, सध्या सुरू असलेली औषधी बंद करण्याचे सांगत आहे. कोणत्याही प्रकारच्या गोळया व औषधी न घेताच केवळ आयुर्वेदिक पाण्याव्दारेच उपचार होत असल्याचा दावा महाराज करीत आहेत.