वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात वाहनचालक ठार

0
13

गडचिरोली,दि.06: शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवासी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात त्या वाहनाचा चालक जागीच ठार झाला. धानोऱ्याहून मुरुमगावला प्रवाशांना सोडून परत येताना या गाडीला रात्री 9 च्या सुमारास हा अपघात झाला. वाहनचालकाचे नाव जितेंद्र सयाम (२४) असे आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचाही पूर्ण चेंदामेंदा झाला. पोलीस अधिक तपास करीत आहेत