भद्रावतीजवळ मालगाडी घसरली

0
5

चंद्रपूर-वर्ध्यावरून बल्लारपूरकडे जाणाऱ्या एका मालगाडीचे डबे भद्रावतीजवळ घसरल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. ब्रेकडाऊनच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेने काही वेळ दिल्ली-चेन्नई मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती. पण, या मार्गावर केवळ एकच डबा घसरला असल्याने तो दूर करण्यात आला. काही वेळातच वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. मालगाडीचे डबे नेमके कशामुळे घसरले याचा तपास सुरू आहे. डबे घसरल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाली करून वाहतूक सुरळीत केली.