गावात स्वच्छता टिकवून ठेवण्यासाठी स्वचाग्रहींची भुमिका महत्त्वाची-बीडीओ जमईवार

0
27

अर्जूनी/मोर,दि.25ः-भारत हा खेड्यापाड्यात वसलेला आहे .गावपातळीवरील स्वच्छ तेच्या कामात सातत्य टिकविणे. ग्रामस्थांना शौचालय नियमित वापर करण्यास परावृत्त करणे. स्वच्छ ता विषयक सवयीत सकारात्मक बदल घडवून आणणे. वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यास परावृत्त करणे. त्यासाठी तांत्रिक माहिती देणे गावात आरोग्य विषयक जनजागृती करणे यासाठी गावस्तारावर ग्रामसभेच्या माध्यमातून निवडलेले स्वच्छ ग्रही मोलाची भूमिका पार पाडून गाव स्वच्छ तेचा वसा सर्व स्वच्छग्रहींनी घेऊन हातभार लावावा असे आवाहन अर्जूनी/मोर पंचायत समिती गटविकास अधिकारी नारायण प्रसाद जमाईवार यांनी केले ते उमेद सभागृहात दि चोवीस एप्रिलला आयोजित स्वच्छाग्रहींना मार्गदर्शन करताना बोलत होते.या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून गटविकास अधिकारी नारायण जमाईवार. गटसमन्वयक एच.आर अंबुले. समूह समन्वयक उमेंद्र भगत विस्तार अधिकारी अनुप भावे उपस्थित होते.
यावेळी अनूप भावे यांनी मार्गदर्शन केले.संचालन एच आर अंबुले तर आभार उमेंद्र भगत यांनी केले