गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा-राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाèयाना निवेदन

0
7

गोंदिया,दि.२३ः- जिल्ह्यात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड होत असून जून महिन्यात शेतकरी धानाची नर्सरी टाकण्याचे काम करते.मात्र यावेळी समाधानकारक पाऊस न झाल्याने ज्या शेतकèयांनी धानाची नर्सरी टाकली होती,ती वाळण्याच्या स्थितीत आली आहे.तर पावसाअभावी अध्र्याहून अधिक शेतकèयानी पाऊन न झाल्याने नर्सरीच लावली नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.दरवर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकèयांना बसत असल्याने सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष देता जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यात यावे,या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जिल्ह्यात आजपर्यंत ५३६.६४ मिमी पावसाची गरज असताना २५२.८६ मिमी पाऊस पडलेला आहे.ही टक्केवारी अत्यंत कमी आहे.यामुळे धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन,सरसकट कर्ज माफ करणे,हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई देणे,जिल्ह्यात धान नर्सरी व शेतीचे संबधित विभागाच्यावतीने सयुंक्त सर्वेक्षण करण्यात यावे,पिक विम्याचा मोबदला देण्यात यावे,पुढील हंगामाकरीता बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावे,जनावरासांठी चारा छावण्या सुरु करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.निवेदन देतेवेळी माजी आमदार राजेंद्र जैन,दिलीप बनसोड,जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन,नरेश माहेश्वरी,गंगाधर परशुरामकर,मनोहर चंद्रिकापुरे,राजलक्ष्मी तुरकर,जितेश टेंभरे,केतन तुरकर,किशोर तरोणे,मनोज डोंगरे,प्रभाकर दोनोडे,रमेश ताराम,कमल बहेकार,सी.के.बिसेन,राजेश भक्तवर्ती,दुर्गा तिराले,कैलास पटले,विणा बिसेन,सुखराम फुंडे,विनोद बोरकर,रौनक ठाकूर उपस्थित होते.