तुमसर : तुमसर-गोंदिया या राज्य मार्गावर मुंबई-हावडा रेल्वे मार्ग फाटकावर रेल्वे उड्डाण पुलाचे काम निधीअभावी कासवगतीने सुरु आहे. तीन महिन्यांपासून केवळबायपास रस्ता तयार करण्यात आला आहे. याच गतीने कामे सुरु राहिली तर किमान चार वष्रे उडाणपुलाच्या पूर्णत्वास लागतील. राजकीय o्रेय घेण्याकरिता मात्र लोकप्रतिनिधी प्रयत्नशील दिसत आहेत.
मागील १३ वर्षापासून उड्डाण पुलाचे काम रखडून पडले होते. रेल्वे मंत्रालय व राज्य शासनाने रेल्वे उडाणपुल तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देत आहे. केंद्रीय मार्ग निधीतून २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे तर रेल्वे विभागाकडून १८ कोटींचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीतत्कालीन अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उडाणपूलाचे भूमिपूजन केले होते. निवडणुकीनंतर येथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
मागील तीन महिन्यांपासून केवळ बायपास रस्त्याचे काम सुरु आहे. कासवगतीने सदर काम केले जात असल्याने अशीच गती असली तर किमान उडणपुल पूर्णत्वास तीन ते चार वष्रे निश्चितच लागतील. प्रचंड वातूकीची कोंडी येथे दररोज होते. अपघाताला आमंत्रण देणारा हा प्रमुखराज्य मार्ग ठरला आहे.केंद्रात व राज्यात सत्ता बदल झाले. त्याचा परिणाम या उडाणपुल बांधकामावर होत असल्याची चर्चा राजकीय वतरुळात उमटत आहेत.