41.8 C
Gondiā
Monday, May 19, 2025
Home Blog Page 5692

युवा स्वाभीमानच्या भीक मांगो आंदोलनाला जनतेचा प्रतिसाद

0

IMG-20160822-WA0112छायाचित्र-गोंदिया शहरात युवा स्वाभीमान व बंसत ठाकुर यांच्यावतीने भीक मांगो आंदोलनार्तंगत आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याघरी भीक मागण्यात आले

गोंदिया(berartimes.com)दि.२२ -जिल्हा सामान्य कुवर तिलकqसह रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या विविध समस्यांना घेऊन सुरु असलेल्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी आज (दि.२२) युवा स्वाभीमान संघटनेच्यावतीने तसेच आंदोलनकर्ते वसंत ठाकूर यांच्यासह आंदोलकांनी भीक मांगो आंदोलन करुन दोन हजारावर निधी गोळा करण्यात आला.येथील आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलकांनी तसेच युवा स्वाभीमानच्या कार्यकत्र्यांनी भीक मांगो आंदोलन केले यावेळी आमदार अग्रवाल यांचे पुत्र विशाल अग्रवाल यांनी मदत निधी देत आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला.तसेच आमदार अग्रवाल समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु सरकार त्याकडे कानाडोळा करीत असल्याचे आंदोलकांना सांगितले.भीक मांगो आंदोलनात गोळा केलेल्या निधीचा धनादेश उद्या मंगळवारला जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. आंदोलनाची सुरवात केटीएस जिल्हा रुग्मालयातून करण्यात आली.शहरातील जयस्तंभ चौक,गोरेलाल चौक,गांधी प्रतिमा,चांदणी चौक,शहर पोलीस स्टेशन ,आमदार निवास मार्गे नेहरु चौकात भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष जितेश राणे,वाय.पी.येळे, बंसत ठाकुर,टोनेश हरिणखेडे,विनोद गौतम,मनोज बिसेन,अरqवद टेंभरे,भरत शरणागत,राजेंद्र पटले,जिवनलाल शरणागत,जगदिश रहागंडाले,कमल राणे,सुनिल वाघमारे,मनुताई उईके,किरण रावते,
स्मीता मेंढे,रवी रहांगडाले,कमल लिल्हारे,नरेंद्र राणे,हौसलाल कटरे,पवन नामणे,शुभम चन्नोरे,शैलेशे लदवार,हिवराज टेंभरे,योगेश टालटे,विकास रहागंडाले,गौरव कोठेवार,दुर्गेश गाते,विकास लामकासे,विक्रम सोनवाने,योगेश डिब्बे,भुमेश गौतम,राजू राऊत,रवी गाते,वाल्मिक ठाकुर,हुमेंद्र पारधी,अनमोल ब्राम्हणकर,राहुल कटरे,सोनल येवले,विक्की बिसेन,विजय पटले,सुनिल साठवणे,संदिप येवले,राजेश कनोजिया,सन्नी लगडे,प्रमोद शहारे,सुनिल यादव आदी आंदोलनकारी सहभागी झाले होते.
गंगाबाई रुग्णालय व केटीएसमधील अव्यवस्था दुरुस्त व्हावी यासाठी १४ ऑगस्टपासून हे आंदोलन करण्यात येत आहे.युवा स्वाभीमानचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी स्वत याप्रकरणी आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

२९ ऑगस्टला विधिमंडळाचे ‘जीएसटी’साठी विशेष अधिवेशन

0

मुंबई – येत्या २९ ऑगस्टला राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमताने मंजूर केलेल्या वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला (जीएसटी) मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन २९ ऑगस्टला घेण्याचे राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी निश्चित केले. या अधिवेशनामध्ये वस्तू व सेवा कर घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी घेण्यात येईल.

नुकत्याच संपलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. केवळ अण्णा द्रमुकच्या खासदारांनी या विधेयकाच्या मंजुरीवेळी सभात्याग केला. दोन्ही सभागृहातील उर्वरित सर्व पक्षांनी घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिला. वस्तू व सेवा कर विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे त्याला देशातील राज्य विधिमंडळाच्या सभागृहांची मंजुरीही आवश्यक आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यातील विधानसभांमध्ये हे विधेयक मांडण्यात येत असून, त्याला मंजुरी देण्याची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक २९ ऑगस्टला मांडण्यात येईल आणि त्याला मंजुरी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

न्या. डॉ. मंजूला चेल्लूर यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

0

मुंबई, दि. २२ – कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून बदलीवर आलेल्या न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली.
राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, जयकुमार रावल, महादेव जानकर, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या काळजीवाहू मुख्य न्यायाधीश विजया कापसे ताहिलरामाणी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर शपथविधीला उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मुख्य न्यायमुर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. राष्ट्रगीताने शपथविधीची सुरुवात व सांगता झाली.
दिनांक ५ डिसेंबर १९५५ रोजी बल्लारी येथे जन्मलेल्या मंजुळा चेल्लूर यांनी बल्लारीच्या महिला महाविद्यालयातून कला स्नातक ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९७७ साली त्यांनी बंगलोर येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. सन १९७८ साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली.

गायीला ‘माता’ मानण्याचा सल्ला देणारे अाहेत कोण? -शरद पवार

0

पुणे- ‘गायीला आई न म्हणणाऱ्यांनी देश सोडून जावे, असे देशातल्या एका मुख्यमंत्र्याकडून ऐकायला मिळाले. गायीचा आदर आम्ही सर्वच जण करतो. पण आमच्या आईच्या जागी गायीला माता म्हणण्याचा आदेश द्यायचा अधिकार यांना कोणी दिला? देश यांच्या मालकीचा आहे का,’ असा सवाल माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.
ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री डॉ. भाई वैद्य यांना पवारांच्या हस्ते पुण्यभूषण पुरस्कार देऊन गाैरविण्यात अाले. या वेळी अध्यक्षपदावरून पवार बाेलत हाेते. ‘त्रिदल’च्या वतीने गेल्या २८ वर्षांपासून हा पुरस्कार दिला जाताे. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष खासदार शरद यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज, ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्ड आदींची प्रमुख उपस्थिती हाेती. ‘त्रिदल’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले.
‘देशाची स्थिती आज बिकट आहे. काश्मीर धुमसतो आहे. काश्मीर समस्येने स्वातंत्र्यानंतर देशाला सर्वाधिक त्रास दिला आहे. सत्य बोलण्यावर बंधने आली आहेत. लोकांच्या भावना कशानेही दुखावू लागल्या आहेत. सामाजिक विषमतेचा देशाचा सर्वात जुना आजार कायम आहे. काही लोक अजूनही विसाव्या शतकातच जगत आहेत. चीन, युरोप कुठे पोचला आणि आपण कुठे याचा विचार करावा लागेल,’ याकडे शरद यादव यांनी लक्ष वेधले.
डॉ. वैद्य म्हणाले, की ‘इसिसच्या रुपाने धर्मवादाचा धोका जगभर धुमाकूळ घालतो आहे. भारतातही धर्माधिष्ठित राजकारणाची भूमिका मांडणारे लोक आहेत. जगभर भयानक विषमता निर्माण झाली आहे. या आव्हानांचा सामना तरुणांना करावा लागणार आहे. आर्थिक वितरण आणि जात निर्मूलनाचे कामही तरुणांना करायचे आहे.’

लायन्स क्लब राईस सिटी तर्फे ध्वजारोहण

0

वृक्षारोपण व देशभक्ती गीत स्पर्धा उत्साहात
गोंदिया – लायन्स क्लब राईस सिटी व हेल्प लाईन संघटना गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करून तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली. तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम व देशभक्ती गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले.
एमआयडीसी परिसरात स्व. अमृतलाल कोठारी फॅक्टरीच्या प्रांगणात संस्थेच्या अध्यक्षा लायन नीलम बग्गा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर लायन सुशील सिंघानिया यांच्या फॅक्टरी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले. या नंतर वाधवा यांच्या फॅक्टरी परिसरात देशभक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. यात शालेय विदयार्थी व संस्थेच्या सदस्यांनी सहभाग घेऊन स्पर्धेला यशस्वी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने लायन्स क्लबच्या अध्यक्षा लायन नीलम बग्गा,सचिव लायन अनिता बिसेन, कोषाध्यक्ष लायन अजितसिंग बग्गा, प्रोजेक्ट चेयरमेन लायन अनिल वाधवा ,हेल्प लाईन अध्यक्ष जगदीश मिश्रा, ला.प्रेम मुंदळा, ला.राजेंद्र बग्गा, ला. भरत क्षत्रिय, ला.अजय जैसवाल,ला.प्रदीप जैसवाल, ला.राजू बिसेन, ला.रायकवार, ला.अर्चना कोठारी, ला.प्रकाश पटेल,ला.पुष्पक जसानी, ला.रीता जैसवाल, ला.शशि वाधवा, ला.वंदना साहू, ला.शकुन रायकवार, पदम् लुनिया, कुँवरसिंह भारद्वाज, मनमोहन गुप्ता ,प्रदीपसिंग् ठाकुर, गणेश चौहान, सुरेन्द्र सोनी, ला.नरेश साहू,ला.सुरेन्द्र पारधी आदींसह शालेय विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जय’ जिवंत नाही-खा.पटोले

0

भंडारा: जिल्हयातीलच नव्हे तर राज्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेला वाघ ‘जय’ याची शिकार करण्यात आली असुन तो जिवंत नसल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.तसेच या सर्व प्रकाराला वन विभाग पुर्णपणे जबाबदार असुन त्याची तक्रार पं्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करून ‘जय’ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी विश्रामगृहात आयोजित पत्रकारपरिषदेत सांगीतले. आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ असलेला ‘जय’ याची अज्ञातांकडुन शिकार करण्यात आली आहे.मात्र वनविभाग त्या संदर्भातील तथ्य पुढे न आणता निरर्थक गोष्टींचा आधार घेत ‘जय’ जिवंत असल्याचा देखावा करीत आहे.‘जय’ च्या नसण्याला पुर्णपणे वनविभाग जबाबदार असुन या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सुध्दा खा.पटोले यांनी केली. ‘जय’ हा उमरेड-कºहांडला अभयारण्यात येणाºया पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र होते.‘जय’ ला बघण्याकरीता देश-विदेशातुन पर्यटक येत असत त्यामुळेच एका वर्षात शासनाला २४ कोटी रूपयाचे भांडवल प्राप्त झाले होते.तसेच उमरेड-कºहांडला अभयारण्य परिसरातील बेरोजगारांना बºयापैकी रोजगार प्राप्त झाला होता.मात्र मागील दोन-तीन महिन्यापासुन ‘ज़य’ उ म् ा र े ड – क º ह ा ं ड ल् ा ा अभयारण्यातुन बेपत्ता असल्याने पर्यटकांनी अभयारण्याकडे पाठ फिरविली आहे.त्याचा फटका शासनाच्या महसुलावर बसत असून परिसरातील बेरोजगारांच्या रोजगाराचा सुध्दा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘जय’ याने अभयारण्यातुन स्थलांतरण केले असल्याचे वन विभागातर्फे सांगीतले जात असले तरी ‘जय’ ची शिकार झाली असून तो जिवंत नाही हीच वास्तविकता असल्याचे खा.नाना पटोले यांनी सांगीतले.या प्रकरणी काही दिवसातच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन या विषयी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेसुध्दा सांगीतले. सध्या जिल्हयातील धान पिकावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव दिसुन येत असून त्यामुळे मोठया प्रमाणात पीकांची हानी झाली आहे.त्याकरीता शेतकºयांनी पिक विमा योजनेअंतर्गत संबंधित तालुका कृषी विभागाकडे दोन प्रतित अर्ज सादर करावे असे आवाहनही खा.पटोले यांनी केले. विरोधकांकडुन भंडारा जिल्हयातील गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पातुन वगळण्यात आल्याचा अपप्रचार सुरू असुन गोसेखुर्द हा आजही राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि त्याकरीता केंद्र सरकारने निधी दिला असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणर आहे.देशात एकुण ११ राष्ट्रीय प्रकल्प असुन त्यामध्ये गोसे खुर्द या प्रकल्पाचा सुध्दा समावेश असल्याचे खा.पटोले यांनी सांगीतले.गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामात मोठया प्रमाणात अनियमितता आढळुन आल्याने मागील पास ते सहा वर्षापासुन केद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पाला निधी नाकारला होता.मात्र केदं्रीय समितीने गोसे प्रकल्पाचा आढावा घेत राज्य सरकारला गोसे खुर्द प्रकल्पाच्या बांधकामामध्ये झालेल्या अनियमितता सुधारण्याचे आदेश दिल्याने राज्य सरकारने ते दुरूस्त केले आणि त्यामुळेच केंद्र सरकारने गोसे खुर्द प्रकल्पासाठी निधी मंजुर केला असुन २०२०-२१ पर्यंत गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येणार असल्याचे खा.नाना पटोले यांनी यावेळी सांगीतले.तुमसर तालुक्यातील बावनथडी योजनेकरीता केंद्राच्या प्रधानमंत्री जलसिंचन योजनेअंतर्गत १७०० कोटी रूपये मंजुर झाले असून बावनथडी प्रकल्प लकवरच पुर्णत्वास येणार असल्याचे खा.पटोले सांगीतले.

तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू

0

वृत्तसंस्था
हैद्राबाद, दि. 22 – तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यात खासगी बस पुलावरुन कालव्यात कोसळून अपघात झाला आहे. सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस हैद्राबादहून खम्मम जिल्ह्याकडे चालली असताना हा अपघात झाला. खम्माम जिल्ह्यामधीलच नागार्जूनसागर कालव्यात बस कोसळली आहे.

वीरेन्द्र जायसवाल ने एमएलसी हेतू केंद्रीय मंत्री गडकरी को आवेदन सौंपा

0

नागपुर। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के निवासस्थान पर एड. वीरेन्द्र जायसवाल ने भंडारा-गोंदिया विधान परिषद चुनाव हेतू भाजपा की उम्मीदवारी मिलने हेतू केंद्रीय मंत्री गडकरी को आवेदन सौंपा। भंडारा के वरिष्ठ भाजपा नेता डा. प्रकाश मालगावे, गोंदिया न.प. बांधकाम सभापती बंटी पंचबुध्दे भी उनके साथ थे।
एड. वीरेन्द्र जायसवाल ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को भंडारा-गोंदिया विधान परिषद चुनाव के संदर्भ में विशेष जानकारी भी दी।
एड. वीरेन्द्र जायसवाल ने इस आवेदन की प्रतिलिपी भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री अमित शाह, प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फड़णवीस, सांसद नाना पटोले, भाजपा अध्यक्ष भंडारा जिला मो. तारीक कुरैशी, भाजपा अध्यक्ष गोंदिया जिला श्री हेमंतजी पटले व पालकमंत्री श्री राजकुमार बडोले को प्रेषित कर भंडारा-गोंदिया विधान परिषद से भाजपा की उम्मीदवारी मिलने हेतू निवेदन किया है।

चौकशी समिती गठीत :शिंगाडा तलाव सौंदर्यीकरणात गैरव्यवहार?

0

गोंदिया,दि.22 : तिरोड्यातील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या ८ कोटी रुपयांच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत प्राप्त तक्रारीच्या आधारे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते हे या समितीचे अध्यक्ष तर जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे सदस्य आहेत. या द्विसदस्यीय समितीला महिनाभरात आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर करायचा आहे.विशेष म्हणजे याच प्रकरणाला घेऊन नगरसेवक देवेंद्र तिवारी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.परंतु न्यायालयाने ती याचिका फेटाळत लघुपाटबंधारे विभागाला तलावासंबधी माहिती देण्याचे निर्देश दिले होते.
तिरोडा नगर परिषदेच्या वतीने तेथील सिंगाडा तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम केले जात आहे. ८ कोटी रुपयांच्या या कामात निविदा प्रक्रियेत व सौंदर्यीकरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार तिरोडा येथील सुनील कुंभारे व इतर तिघांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यात नगर परिषदेचे अध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यावर कायदेशिर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार उपायुक्त (महसूल) तथा प्रभारी अधिकारी, नगर परिषद प्रशासन नागपूर यांनी जिल्हाधिकारी गोंदिया यांना सदर कामाची चौकशी करण्यासंदर्भातील पत्र जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिले.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी याप्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन सदस्यीय समिती नेमून त्यांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय बाहेर येते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

केंद्राकडून तूरडाळसाठा उचलण्यात महाराष्ट्राची हाराकिरी

0

नवी दिल्ली : डाळींच्या दरवाढीचा मुद्दा संसदेत आणि विधानसभांमध्ये गाजल्यानंतरही राज्यांनी केंद्राकडून मंजूर झालेला डाळसाठा घेण्याकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये भाजपशासीत महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात ही राज्ये अव्वल आहे. तब्बल 7000 टन तूरडाळीची मागणी करणाऱ्या महाराष्ट्राला 4352 टन डाळसाठा मंजूर झाला आहे. पण प्रत्यक्षात फक्त 87.29 टन डाळच राज्याने केंद्राकडून घेतली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगाण, छत्तीसगड, बिहार, अंदमान आणि निकोबार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, हरियाना या राज्यांनी तब्बल राज्यांची मासिक मागणी 47 हजार टन तूरडाळीची आहे. केंद्राने बफरसाठ्यातून 29 हजार टन साठा देण्याचे मंजूर केले. प्रत्यक्षात फक्त साडेसहा हजार टनांच्या आसपास साठाच राज्यांनी घेतला आहे. अर्थात, केंद्राकडे 9800 टन तूरडाळीचे पैसे राज्यांनी जमा केले आहेत.
सरकारकडे डाळींचा जवळपास दोन लाख टनांचा बफरसाठा असूनही डाळींच्या महागाईचे माध्यमांमध्ये झळकणारे आकडे आणि राज्य सरकारांकडून डाळ साठा उचलण्याकडे होत असलेले दुर्लक्ष केंद्राच्या चिंतेचा विषय ठरले आहेत. यामुळे राज्यांच्या उदासीनतेबद्दल केवळ हतबलता व्यक्त करण्याऐवजी आता बाजार हस्तक्षेप योजनेमार्फत डाळसाठा बाजारात आणण्याबाबत पर्यायी योजनेवर सरकार विचार करत आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारातील डाळींच्या दरातील तफावतीबद्दलही केंद्राने राज्यांना खडसावले आहे. राज्यांमध्ये ही तफावत सात ते 32 टक्‍क्‍यांपर्यंत पोचली आहे.