36.4 C
Gondiā
Tuesday, May 14, 2024
Home Blog Page 5959

काँग्रेसच्या पाच आमदारांचे निलंबन मागे

0

नागपूर,- राज्यपालांना धक्काबुक्की केल्याने निलंबनाची कारवाई झालेल्या पाच आमदारांना मंगळवारी दिलासा मिळाला आहे. या पाचही आमदारांचे निलंबन मागे घेत असल्याची माहिती राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली.

गेल्या महिन्यात भाजपाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधीमंडळात राज्यपालांचे अभिभाषण होणार होते. राज्यपालांना विधीमंडळात पोहोचू न देण्याची रणनिती काँग्रेसने आखली होती. यानुसार राज्यपालांची गाडी अडवण्यात आली तसेच आमदारांना विधीमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्यादेखील मांडला. मात्र विरोध प्रदर्शन करणा-या काँग्रेसच्या काही आमदारांनी थेट राज्यपालांना धक्काबुक्की केली. यासाठी राहुल बोंद्रे (चिखली), वीरेंद्र जगताप (धामणगाव), जयकुमार गोरे (माण), अमर काळे (आर्वी) आणि अब्दुल सत्तार (सिल्लोड) अशा पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. मंगळवारी हे निलंबन मागे घेण्यात आल्याचे बापट यांनी जाहीर केले.

‘आम्ही घडवू नवा इतिहास’ या पुस्तिकेचे प्रकाशन

0

नागपूर -भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या भाषणावरील आधारीत ‘आम्ही घडवू नवा इतिहास’ या पुस्तिकेचे प्रकाशन मंगळवारी नागपूर येथे भाजपा आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पक्षाच्या सदस्यता अभियानाची योजना मा. अमित शाह यांनी या भाषणात स्पष्ट केली आहे. यावेळी (डावीकडून) राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपा प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट व सहसंघटनमंत्री सुनील कर्जतकर उपस्थित होते.

कृषी विभागाच्या योजना जि.प.कृषी विभागाकडे द्या

0

गोंदिया- राज्यातील जिल्हापरिषदेच्या कृषी विभागाकडे असलेल्या बहुतांश योजना राज्य सरकारच्या कृषी विकास अधिकारी कायालयाकडे हस्तातंरीत झाल्या आहेत.त्यातच कलम १०० व १२३ अतंर्गत केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून मिळणारे अभिकरण अनुदान कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट झाली आहे.त्यात प्रामुख्याने ठिंबक,तुषार,अभियांत्रिकी व केंद्र पुरस्कृत योजनामधून २ ते ४ टक्के अभिकरण मिळायाचे.७३ व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य शासनाचा कृषी विभाग जिल्हा परिषदेस जोडून उपरोक्त योजना ग्रामपंचायत माध्यमातून परिणामकारक राबवण्याकरिता सर्व कृषी योजनांचे एकत्रीकरण ते पोचावयास हव्या होत्या.परंतु त्या योजना न पोचल्याने शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण निमार्ण झाले आहे.त्यामुेळे वरील सर्व योजनांची परिणामकारकरित्या अमलबजावणी करण्ङ्मासाठी ङ्मा योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्ङ्मास पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वी राबविल्या जाऊ शकतात.जिल्हा परिषदेकडे प्रभावी शिक्षित व स्थायी अधिकारी कमचारी वर्ग असल्याने राज्य सरकारच्या कृषीविभागाकडे वर्ग केलेल्या योजना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे हस्तातरीत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषि व पशुसवंर्धन सभापती समन्वय समितीने कृषी व पशुसंवर्धन मत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्कयाडे सोमवारी नागपूर विधानभवानात भेट घेऊन केली आहे.निवेदन देतेवेळ अध्यक्ष दिलीप धोंडगे,गोंदियाचे मोरेश्वर कटरे,रणजीत देसाई,दिंगबर कहाडे,अनिल मनमुळकर,संदिप टाले,संतोष लोंखडे,इश्वर मेश्राम यांच्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातील कृषी सभापती उपस्थित होते.

टाटांचा हवाई ‘विस्तार’ भारताबाहेरही

0

(साभार पीटीआय)
नवी दिल्ली-विदेशी हवाई सफरीसाठीची अनिवार्यता सरकार लवकरच दूर सारेल, असा विश्वास व्यक्त करत भारतात विमान प्रवासासाठी पंख पसरण्यास उत्सुक असलेल्या टाटा समुहातील नव्या विस्तार कंपनीने आता साता समुद्रापल्याड झेप घेण्याचे मनोबल उंचावले आहे. पाच वर्षांच्या आतच २० पेक्षाही कमी विमानांच्या जोरावर कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे स्वप्न रंगविले आहे. यासाठी कंपनी विदेशातील भागीदारांबरोबर चर्चाही सुरू करत आहे.
विदेशातील हवाई प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी कोणत्याही कंपनीला स्थानिक पातळीवरील पाच वर्षांचा अनुभव व ताफ्यात २० विमानांची क्षमता आवश्यक आहे.
टाटा समूह व सिंगापूर एअरलाईन्स यांची भागीदारी असलेल्या विस्तारची भारतातील हवाई सेवा अद्याप सुरू होणे आहे. टाटा समुहाची मलेशियाच्या एअर एशियाबरोबरची देशांतर्गत हवाई सेवा निवडक शहरांमध्ये याच वर्षांच्या मध्यानंतर सुरू झाली आहे.
असे असले तरी विदेशात हवाई सफर घडवून आणण्यासाठीची विमान क्षमता व उड्डाण अनुभव शिथिल होईल, असा आशावाद नव्या विस्तार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फी टेक यूह यांनी सोमवारी नवी दिल्लीत व्यक्त केला.
राजधानीत मुख्यालय असलेल्या विस्तारच्या भारतातील हवाई सेवेला येत्या ९ जानेवारी रोजी प्रारंभ होत आहे. दिल्ली-मुंबई, दिल्ली-अहमदाबाद व अहमदाबाद-मुंबई सेवा सुरू करणाऱ्या विस्तारला गेल्याच आठवडय़ात हवाई चलत परवाना मिळाला.
कंपनीत तूर्त टाटा समुहाचा सर्वाधिक ५१ तर सिंगापूर एअरलाईन्सचा उर्वरित ४९ टक्के हिस्सा आहे.कंपनीच्या ताफ्यात एअरबस कंपनीची ए३२० जातीची विमाने असतील. पहिल्या वर्षांत ८७ विमाने चालविण्याचा कंपनीचा इरादा आहे.

स्पाईसजेटची देणी रक्कम विस्तारली
eco02बिकट आर्थिक स्थितीपोटी अनेक उड्डाणे रद्द करावे लागणाऱ्या स्पाईसजेटकडे विविध गुंतवणूकदार व सेवांचे १,२३० कोटी रुपये थकल्याची माहिती सोमवारी लोकसभेत देण्यात आली. सुरुवातील उड्डाणे रद्द आणि नंतर सरकारी र्निबध यामुळे चर्चेत असलेल्या १८ दिवसांमध्ये तर ही रक्कम २४० कोटी रुपयांनी वधारली आहे.
२२ नोव्हेंबपर्यंत ९९० कोटी रुपयांची रक्कम तेल कंपन्या, विमानतळ प्राधिकरण तसेच विदेशी व भारतीय गुंतवणूकदार यांच्यासाठी देय असलेल्या रकमेमुळे वाढली आहे. या दरम्यान १० वैमानिक सोडून गेल्याची वेळ आलेल्या स्पाईसजेटची विमाने तसेच उड्डाणे यांचीही संख्या गेल्या महिन्याभराच्या आत कमालीची रोडावली आहे.
पुन्हा स्वस्त हवाई प्रवासाची स्पर्धा
नाताळ आणि नवे वर्ष नजीक येऊन ठेपले असताना हवाई कंपन्यांमधील कमी दर युद्धाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वाडिया समुहातील स्वस्त हवाई प्रवासासाठी ओळखले जाणाऱ्या गो एअरने यंदा १,४६९ रुपयांमध्ये पुढील वर्षांसाठीचा हवाई प्रवास उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी सोमवारपासून पाच दिवस आगाऊ तिकिट नोंदणी करणे बंधनकारक आहे.
१ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान अशा सवलतीत प्रवास करता येईल. वर्षांची पहिली तिमाही हवाई प्रवासासाठी कमी प्रतिसादाची मानली जाते. देशांतर्गत हवाई कंपन्यांमधील किमान दर अस्वस्थता यंदाच्या दिवाळीपूर्वी नोंदली गेली होती. तर हवाई प्रवास व्यवसायाला प्रारंभ करताने ऑक्टोबरमध्ये नवागत एअर एशियानेही ९०० रुपयांपुढील सवलतीत विमान प्रवास देऊ केला होता. गो एअर कंपनी देशभरातील २२ ठिकाणांहून आपल्या १९ एअरबसच्या माध्यमातून उड्डाणे घेते.

काश्मिरमध्ये भाजपासाठी सर्व पर्याय खुले – अमित शाह

0

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. २३ – आम्ही सत्तेत सामील होऊ शकतो किंवा कुणालातरी पाठिंबा देऊ शकतो असे सांगत काश्मिरमध्ये भाजपासाठी सगळे पर्याय खुले असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. झारखंडमध्ये ४० ते ४१ जागी विजय दृष्टीपथात असून भाजपाचे सरकार येईल हे स्पष्ट झाले आहे. तर जम्मू व काश्मिरमध्ये भाजपाला २५ जागा मिळण्याची व पीडीपीला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. नॅशनल काँग्रेसला १६ व काँग्रेसला ११ जागा मिळण्याची शक्यता असून सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांना विरोधी बाकांवर बसायला लागण्याची चिन्हे आहेत.

पीडीपीच्या एका नेत्याने मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नरेंद्र मोदींशी बोलावे आणि सत्ता स्थापन करावी असे सूचक उद्गार काढले असल्यामुळे तसेच अमित शाह यांनीही सगळे पर्याय खुले असल्याचे विधान केल्यामुळे भाजपा व पीडीपी सत्ता स्थापन करेल अशी चर्चा आहे. तसे झाले तर मुख्यमंत्रीपद नाही, परंतु उपमुख्यमंत्री भाजपाचा असेल का हा प्रश्नही उपस्थित होणार आहे.

भाजपाच्या संसदीय कार्यकारिणीची उद्या बैठक असून त्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल असे समजते. झारखंडमध्ये जनता परीवार व काँग्रेस एकत्र आले परंतु त्यांना आठ जागा जेमतेम मिळाल्याचे दिसत आहे. तसेच काश्मिरमध्येही काँग्रेसला फारशा जागा मिळालेल्या नाहीत, हे बघता भाजपाची वाटचाल आधी ठरवल्याप्रमाणे काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनेच होत असल्याचे अमित शाह म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपा व मोदींच्या नेतत्वावार जनतेने विश्वास ठेवल्याचे दिसून येत असल्याचेही शाह म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेची मंजुरी

0

नागपूर : मराठा आरक्षणाच्या नव्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचं हे विधेयक मांडलं. यावर विधानसभेनं सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे.

उच्च न्यायालय आणि त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानं देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम ठेवल्यानंतर, सरकारनं नवं विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता न्यायालयाच्या नकारानंतर मराठा आरक्षण विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे.

आघाडी सरकारच्या विरोधात मतं तयार करताना युतीच्या नेत्यांनी या मुद्याला हत्यार बनवलं होतं. त्यामुळं शेवटच्या काळात का होईना काँग्रेसला मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावंच लागलं. पण, कायद्याली त्रुट्या आणि चुका यामुळं उच्च न्यायालयानं मराठा समाजाला आरक्षण देण्याला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानंही मोहोर उमटवल्यानं, सरकार कोंडीत सापडलं होतं.

आता याच मराठा आरक्षणावरुन सरकारविरोधात राजकीय वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळंच आता नव्या विधेयकाच्या माध्यमातून कायद्यात दुरुस्ती करण्याचा सरकारचा विचार आहे. पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पुढे सरसावलं आहे. आता याला कोर्टाकडून काय प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुस्लिम आरक्षणाचा समावेश नसल्यानं गोंधळ :
दरम्यान मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करताना, मुस्लिमांच्या आरक्षणाचा कुठलाच उल्लेख न केल्यानं विधानसभेत विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. आघाडी सरकारनं मराठ्यांसोबतच मुस्लिमांना देखील आरक्षणाचा निर्णय घेतला होता.पण युती सरकारनं आज मराठा आरक्षणाचं विधेयक सादर करताना, मुस्लिम आरक्षणाचा उल्लेख टाळल्यानं विरोधकांना जोरदार गोंधळ घातला. त्यामुळं दिवसभरातून तिसऱ्यांदा विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.

कोण म्हणतं शिक्षण हक्क कायदा लागू आहे?

0

राज्यात शिक्षण हक्क अधिकार कायदा लागू आहे का? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला सकारात्मक उत्तर मिळणे कठीण आहे. नव्हे तर बहुतांश पालकांना आणि शिक्षणतज्ज्ञांना जरी विचारले तरी ते म्हणतील, ‘कुठे आहे कायदा?’ या कायद्यासंदर्भातील खदखद केवळ शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ यांच्यातच निर्माण झालेली आहे असे नाही. ज्यांच्यावर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, तेही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत. एकूणच चित्र हे भयानक आहे.
Right to Educationसमाजातील शेवटच्या स्थरातील मुलांनाही हक्काचे शिक्षण कायद्याने मिळवून देणा-या या कायद्याची राज्यात खूप फरफट होत असून गरीब, आर्थिक दुर्बल आणि विविध प्रवर्गातील शेकडो विद्यार्थ्यांना कायद्याने शिक्षण हक्काची तरतूद असतानाही त्यांना अधिकार मिळवून देण्यास राज्य शालेय शिक्षण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
समाजातील प्रत्येक घटकांमधील बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळावा हा उदात्त हेतू समोर ठेवून मागील केंद्र सरकारने बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा कायदा केला होता. देशात शिक्षणाच्या क्षेत्रात निर्माण झालेली श्रीमंत आणि गरिबांच्या विद्यार्थ्यांची दरी यानिमित्ताने तरी कमी करता येईल आणि शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचा हक्क मिळवून देता येईल, ही भूमिका त्यामागे होती. मात्र या भूमिकेला राज्यात हरताळ फासला गेला आहे. शिक्षण हक्क अधिकार कायद्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात सुरू होऊन तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असताना नेमके या कायद्याने काय साधले? किती आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला? त्यांना कोणकोणत्या इंटरनॅशनल शाळांमध्ये कायद्याने मिळालेले प्रवेश मिळवून दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जर तपासून पाहिली तर केवळ नकारात्मक उत्तरेच मिळतील. यामुळेच या तीन वर्षात या कायद्यातील प्रत्येक तरतुदीला जितक्या प्रमाणात वाटोळे करून गोंधळ घालता येईल तितका गोंधळ घालण्यात शालेय शिक्षण विभागाला यशस्वी ठरले आहे, असे म्हटले गेले तर फारसे वावगे ठरणार नाही.
शालेय शिक्षण विभाग या कायद्यानंतर खूपच चर्चेत आला. याला अनेक कारणे असली तरी तीन वर्षानंतरही हा कायदा आणि त्यातील तरतुदींचा प्रत्येक अधिकारी स्तरावर आपापल्या मर्जीने अर्थ घेतला गेला हे मुख्य कारण यामागे आहे. ज्यावर गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक असताना ती अद्यापही होत नाही. आणि केली तरी त्याची म्हणावी तशी दखलही घेतली जात नाही. शिक्षण आयुक्त असो, अथवा शिक्षणाधिकारी. जो-तो आपल्या मर्जीने या कायद्याच्या संदर्भात निर्णय घेतो. वाट्टेल तसा अर्थ लावला जातो. यासाठी अनेक उदाहरणे देता येतील. शिक्षण हक्क अधिकार कायद्यात किमान ४० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असावा असे कडक निर्बंध असतानाही शिक्षण विभागाने ते धुडकावून ही संख्या ६० वर नेली, यामुळे एक-दोन नाही तर तब्बल ६० हजारांच्या दरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली गेली. तोच प्रकार, शिक्षकेतर कर्मचा-यांच्या संदर्भात झाला. यामुळे या कायद्याच्या संदर्भात नेमके काय सुरू आहे हे कोणताही अधिकारी ठामपणे सांगू शकेल, असे राज्यात दिसणार नाही.
कायदा नीट न समजल्यामुळे जुने कायदे, परिपत्रक, निर्णय, अधिनियम, विविध समित्यांनी केलेल्या शिफारसींचीही गरज पडल्यास वाट्टेल तसे धाब्यावर बसविले गेले. अतिरिक्त शिक्षक, संचमान्यता, शाळांसाठीच्या सोयी-सुविधा, शिक्षणातील गुणवत्ता, प्राथमिक, पूर्व प्राथमिकचे प्रवेश आदी अनेक विषयांमध्ये सरमिसळ करण्यात आली. कायद्यातील तरतुदी काय आहेत, याचा दुरान्वयानेही संबंध नसताना अनेक विषयांवर गोंधळ माजवला गेला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न पद्धतशीरपणे बाजूला सारून केवळ सोयी-सुविधांच्या विषयावर खलबते केली गेली. परिणाम काय होत आहेत, याचा विचारच गाडला गेला. तर दुसरीकडे देशात केंद्रीय मंडळाच्या शाळांनी केलेल्या प्रयोगाच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक गुणवत्तेसाठी काय करता येईल, याकडे लक्ष दिले गेले नाही. उलट ठरावीक अधिका-यांना आणि काही संस्थांना, संस्थाचालकांना घेऊन गणित, इंग्रजी विषयांच्या प्रशिक्षणासाठीचा हिशोब मांडून लाखो रुपये लाटले गेले. आणि जो मुख्य प्रश्न होता, गुणवत्ता आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तो मात्र न सोडविता अधिकाधिक जटिल करण्यातच शिक्षण विभागाने धन्यता मानली.
कायद्याने तरी आमच्या पोरांना शाळांमध्ये प्रवेश द्या हो! असा टाहो फोडून शेकडो पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयांच्या पाय-या झिझवल्या, तरीही प्रवेशाची जबाबदारी असलेल्या शिक्षणाधिका-यांना पाझर फुटला नाही. ज्या शाळा मोकाटपणे कायद्याला डावलून प्रवेश नाकारत होत्या, त्यांपैकी एकाही शाळेवर शिक्षण विभागाला कारवाई करता आली नाही. नव्हे तर ती केली नाही. आता तर पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वीच खासगी शिक्षण संस्थांनी आपले प्रवेश सुरू केले असून प्राथमिक शिक्षण विभाग मात्र सर्व काही अलबेल असल्याच्या आविर्भावात आहे. खासगी शाळांतील सर्व प्रवेश संपल्यानंतर हा विभाग हळूच कार्यक्रम जाहीर करेल आणि तेव्हा कुठे ऑनलाइन, लॉटरी पद्धतीने प्रवेशाचे सोंग सुरू होईल. मात्र तोपर्यंत मोठ्या आणि श्रीमंत शाळांतील जागाच शिल्लक राहणार नाहीत. यासाठी अजूनही हातात वेळ आहे, तो जाणार नाही याची दखल जर शिक्षण विभागाने घेतली तर मागील तीन वर्षात ज्या चुका प्रवेशाच्या संदर्भात झाल्या त्यात काही तरी सुधारणा करण्याची संधी मिळेल यात शंका नाही.(साभार प्रहार)

पीडीपीशी युती करण्यास काँग्रेसची तयारी

0

पीटीआय
नवी दिल्ली-जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने सत्तास्थापनेसाठी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला (पीडीपी) पाठिंबा देण्याची तयारी दाखविली आहे. जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पीडीपी आणि भाजप या दोन्ही पक्षांना जनतेचा कौल विभागून मिळाल्याने एकाही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांची मदत घेणे अपरिहार्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आम्ही पीडीपीला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले. काँग्रेसने यापूर्वीही पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांशी युती केली होती. मात्र, काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यापूर्वी काँग्रेस आणि पीडीपी सत्तेत एकत्र होते, मात्र, अमरनाथच्या मुद्द्यावरून ही युती संपुष्टात आली होती.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुलाम नबी आझाद काँग्रेसचा मुख्य चेहरा होते. विधानसभेच्या निकालांवरून पीडीपी हा राज्यात सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरणार, हे स्पष्ट झाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. तब्बल २९ जागांवर आघाडीवर असणाऱ्या पीडीपीला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस किंवा भाजपची मदत घेणे अपरिहार्य आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्ता?

0

नागपूर-राज्यातील शासकीय व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना ७ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतचा लवकरच निर्णय अपेक्षित असून नव्या सरकारकडून कर्मचाऱ्यांना ही नववर्षांची भेट असेल, असे मानले जात आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता सूत्राकडून व्यक्त करण्यात आली.
केंद्र सरकारच्या वतीने एकदा जानेवारीला व दुसऱ्यांदा जुलैमध्ये असा वर्षांतून दोन वेळा आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता जाहीर केला जातो. केंद्राने जाहीर केलेला भत्ता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना जसाच्या तसा आणि त्याच तारखेपासून लागू करण्याचा राज्य सरकारनेही पूर्वीच धोरणात्मक निर्णय घेतला आहे. आघाडी सरकारमधील मधला काही कालखंड सोडला तर, राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढ दिली जाते. केंद्र सरकारने १ जुलै २०१४ पासून आपल्या कर्मचाऱ्यांना ७ टक्के महागाई भत्तावाढ जाहीर केली आहे. ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना लगेच लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेते शरद भिडे व अन्य संघटनांनी मुख्यमंत्र्यांना स्वंतत्र निवेदने देऊन केली होती. त्यानुसार वित्त विभागाने तसा सकारात्मक प्रस्ताव तयार केल्याचे समजते.

जम्मू काश्मिरात पीडीपी भाजपमध्ये युतीची शक्यता

0

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू न शकल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झालीये. मात्र, पीडीपी हा सगळ्या मोठा पक्ष ठरलाय. पीडीपीने सर्वाधिक 29 जागा जिंकल्या आहे. तर भाजपने दुसर्‍या स्थानावर झेप घेत 27 जागा पटकावल्या आहे. नॅशनल कॉन्फरन्सने 16 जागा जिंकल्या आहे. त्यामुळे पीडीपीला कुणाचा तरी पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करावे लागणार आहे. त्यामुळे काही शक्यता निर्माण झाल्या आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 87 जागांसाठी मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आलीये. बहुमतासाठी 44 जागांचा आकडा गाठणे आवश्यक आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार पीडीपी 29, भाजप 25, नॅशनल कॉन्फरन्स 11 आणि अपक्षांनी 7 जागा जिंकल्या आहे. पहिली शक्यता पडताळून पाहिली तर पीडीपी आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात. पीडीपीच्या 29 आणि भाजपच्या 27 जागा मिळून 56 जागा होता. त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होता. दुसरी शक्यता अशी की, पीडीपीने काँग्रेसशी हातमिळवणी केली तर पीडीपीच्या 29 जागा आणि काँग्रेसच्या 11 जागा मिळून 40 जागा होत्यात. पण तरीही आणखी 4 जागा लागतील. यासाठी अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल. त्यामुळे आता किंगमेकरची भूमिका कोण साकरणार हेही महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे पीडीपीच्या नेत्यांनी भाजपला सोबत घेण्यात काहीही गैर नाही असं विधान केलंय. जर पीडीपी आणि भाजप एकत्र आले तर चित्र स्पष्ट होईल.

जम्मू-काश्मीर विधानसभेचा आखाडा

एकूण जागा = 87
बहुमताचा आकडा = 44

शक्यता 1: (सर्वांत अधिक शक्यता)
पीडीपी 29 + भाजप 27 = 54

शक्यता 2:
पीडीपी 29 + काँग्रेस 11 = 40

शक्यता 3: (कमी शक्यता)
भाजप 27 + नॅशनल कॉन्फरन्स 16 + इतर 4 = 47