30.9 C
Gondiā
Friday, May 16, 2025
Home Blog Page 6485

‘पोलिस यंत्रणेतील राजकीय हस्तक्षेप कमी करणार

0

मुंबई- पोलिस यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करणार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) जाहीर केला आहे. राज्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘पोलिस यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप कमी करणार आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी कायद्याच्या कचाट्यातून त्याची सुटका होणार नाही. पोलिसांचे आधुनिकीकरण व सक्षमीकरणावर भर देणार आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातील गैरवापरावरही नियंत्रण मिळवणार आहे.दरम्यान, पोलिस यंत्रणेच्या सक्षमीकरणाबरोबरच पोलिस महासंचालकांचे अधिकार वाढवण्याचा निर्णय जाहीर केला.

ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा

0

नागपूर- केंद्रात आणि राज्यात ओबीसी विकास मंत्रालयाची स्थापना, अनुसूचित जाती-जमातीसाठी असलेल्या कलम ३४० प्रमाणे ओबीसींची स्वतंत्र सूची, ओबीसींच्या लोकसंख्येच्या तुलनेत अर्थसंकल्पात तरतूद आणि ओबीसींची जनगणना, या अत्यंत कळीच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा सर्वच
पातळ्यांवर लढा पुकारण्यात येईल, असा इशारा ओबीसी संघटनांच्या गोलमेज परिषदेतून रविवारी देण्यात आला.तसेच राज्यातील खासदार,आमदार यांच्यासह स्थानिक पातळीवर या परिषदेत तयार करण्यात आलेला मसुदा देऊन शासन दरबारी लावून धरण्यासाठी त्यांच्यावर दबावतंत्रासोबतच नागपूर येथे सुरु होणार्या अधिवेशनाच्या पहिल्याच
दिवशी ओबीसींच्या मुद्यावर राज्यातील शाळा महाविद्यालय बंद करण्याबाबतचा विचार करण्यात आला.

ओबीसी गोलमेज परिषदेतील सूर

ओबीसींच्या विदर्भातील विविध संघटनांनी एकत्र येत ओबीसींची गोलमेज परिषद धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये आयोजित केली. आंदोलक, कार्यकर्ते, विचारवंत, नेते, कर्मचारी, विद्यार्थी आदी मान्यवर यात सहभागी झाले. सर्वच संघटनांचे एकमत असलेला ओबीसी प्रश्नांवरील अजेंडा या परिषदेतून तयार करण्यात आला. ओबीसींच्या लढ्यासाठी संयुक्त
कृती समितीही स्थापन करण्यात आली. महात्मा फुले समता परिषदेचे प्रा. दिवाकर गमे, ओबीसी मुक्ती मोर्चाचे नितीन चौधरी, ओबीसी संघर्ष समितीचे शेषराव येलेकर,
ओबीसी कृती समितीचे सचिन राजूरकर, ओबीसी एकता मंचचे सुनील पाल, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे,गोदिया जिल्हा ओबीसी कृती समितीचे सदस्य व बेरार टाईम्सचे संपादक खेंद्र कटरे,युवा भोयर पवार मंचचे मनोज चव्हाण,उषाकिरण थुटे आदी प्रमुख मान्यवरांनी संबोधित केले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे भरतीप्रक्रियेबाबतचे अन्यायकारक घोषणापत्र मागे घ्यावे, नोकरीतील अनुशेष त्वरित भरण्यात यावा, पदोन्नतीतील आरक्षण लागू करावे,
आदिवासी जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण वाढवावे, पेसा कायदा रद्द करावा, आदी मागण्या करण्यात आल्या. पुढील काळात जिल्ह्यासह तालुकापातळीवर आंदोलने उभारली पाहिजे. प्रश्?नांवर अभ्यासासाठी गट तयार केले पाहिजे. ओबीसी जनगणना करण्यास बाध्य करण्यासाठी मोठी आंदोलने उभारली पाहिजे, असे मतही व्यक्त करण्यात आले.
परिषदेचे आयोजन महात्मा समता परिषदेचे प्रा.दिवाकर गमे,अ‍ॅड.बाबुराव बेलसरे,पत्रकार प्रमोद काळबांडे यांनी केले होते.या परिषदेला जयंत मानकर,केशव तितरे,दिनानाथ
वाघमारे,मुकुंद अडेवार,दादाजी चाफले,पांडुरंग नागपूरे,रामदास निमरळ,योगेशर करोले,देवीदास गावंडे,धन्नालाल नागरीकर,अनिल डोंगरवार,संदिप भारंबे,गुणवंत देशमुख,बबनराव फंड,हिराचंद बोरकुटे,अेिशनी सुयर्वंशी,अविनाश पाल,प्रियंका गुडधे,अेिशनी राऊत,गोविंदराव भेंडे,वसंतराव ढगे,प्रदिप वादाफळे,यशवंत फुंडे,धमार्दास रेवतकर,गणेश भोयर,कृष्णा देवासे,मुकुंद पंडागळे,अरुण शहारे,श्रावण खरकाटे,दिलीप चवखळे,प्रदिप महल्ले,शिरीष बुचे यांच्यासह महात्मा फुले समता परिषद,
ओबीसी संघर्ष समिती, ओबीसी कृती समिती, ओबीसी आरक्षण हक्क समिती, ओबीसी कर्मचारी असोसिएशन, संघर्ष वाहिनी, युवा भोयर पवार मंच, आरओबीसी,
शिक्षक भरती संघटना, अखिल भारतीय कुणबी, ओबीसी मराठा सेवा संघ, ओबीसी सेवा संघ, बामसेफ, ओबीसी महाराष्ट्र संघर्ष समिती, आयटीआय निदेशक
संघटना, एलआयसी ओबीसी कर्मचारी वेलफेयर असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.

दलित आश्रमशाळांच्या अनुदानाचा प्रश्न लवकरच सोडवणार !

0

मुंबई : महाराष्ट्रातील दलित आश्रमशाळांच्या अनुदानाचा गेली बारा तेरा वर्षे रेंगाळत पडलेला प्रश्न आपण लवकरच मार्गी लावू असे आश्वासन राज्याचे समाजकल्याणमंत्री विष्णू सावरा व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आश्रमशाळा कर्मचारी व संचालकांच्या शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थांनी चालवलेल्या 290 आश्रमशाळा गेली बारा – तेरा वर्षे विना अनुदानित आहेत. सर्व विना अनुदानित आश्रमशाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला तरीही दलित विद्यार्थ्यांसाठी चालवलेल्या आश्रमशाळांना मागील काँग्रेस आघाडी सरकारने शेवटपर्यंत अनुदानापासून वंचित ठेवले. या शाळा चालवणारे संस्थाचालक व कर्मचारी गेली अनेक वर्षे अनुदानासाठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्र भाजपाने संस्थाचालकांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा दिला असून आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात देखील या मुद्दाचा समावेश केला होता. राज्य भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी हा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांनीच पुढाकार घेऊन शिष्टमंडळासह मंत्री महोदयांच्या भेटी घेतल्या व अनुदानासंबंधी निवेदन दिले. त्यावेळी लवकरात लवकर या आश्रमशाळांना अनुदान देण्याचा प्रयत्न आपण करू असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी दिले.

शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष रमेश भानवे, भाजपाचे सुशांत भूमकर, रमेश सुलताने, शिवाजी महानवर, शैलेश कांबळे, संदीप सूर्यवंशी, सोहनकुमार धार्मिक, प्रसाद कुलकर्णी, विजय गायकवाड, प्रभाकर मुळे, होनराव, मुरतुडे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करेल

0

भंडारा: गावातील प्रयोगशिल शेतकऱ्यांनी शेतीमालाच्या मार्केटिंगचे जे तंत्र अवलंबिले ते जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जमले नाही हीच या गावाची शक्ती आहे. म्हणूनच संपूर्ण जिल्ह्याला दिशा देण्याचे काम गर्रा बघेडा करु शकते. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा करण्याच्या माझ्या स्वप्नाला वास्तविकतेमध्ये आणण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.

सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये निवडलेल् या गर्रा बघेडा या गावी नानाभाऊ पटोले यांनी गावात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना खा.पटोले बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी, आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, सरपंच वसंतराव तरटे व सर्व प्रशासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.खा.पटोले म्हणाले, आदर्श गावाची सुरुवात गावाच्या एकोप्यापासून व्हायला पाहिजे. मतभेदाचे सर्व विचार बाजूला ठेवून गावातील जनता काम करण्यासाठी एकत्र येवू आणि गर्रा बघेडा हे महाराष्ट्रासाठी रोल लमॉडेल करू. गावात चकचकीत रस्ते किंवा समाज मंदिर असल्याने गावाचा विकास झाला असे होत नाही.

गरीबांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना चांगले जीवनमान जगण्यासाठी वातावरण निर्मिती करणे हे आदर्श ग्राममध्ये अपेक्षित आहे.

यासाठी गावातील सर्व लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे.यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, आदर्श गावातील लोकांना श्रम करावे लागणार आहे. सगळ्या योजनांची अंमलबजावणी गावात करून घेण्यासाठी गावातीलच लोकांनाच पुढाकार घेवून प्रयत्न करावयाचा आहे. तुमच्या प्रयत्नांनी हे गाव महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आदर्श ग्राम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे म्हणाल्या, लोकसहभागातूनच आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी यशस्वी होईल. गावातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या लोकांपर्यंत गावातील संसाधने पोहचविण्याची जबाबदारी गावकऱ्यांची आहे. गावात एकही गुन्हा घडणार नाही. महिला सभा, बाल सभा, ग्राम सभा वेळेत घेतल्या जाऊन त्यामध्ये गावाच्या हिताचे नियोजन गावकऱ्यांनी करावयाचे आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले, सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय विभागाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी सरपंच वसंतराव तरटे यांनी प्रास्ताविकामध्ये गावाचा लेखाजोखा मांडताना गावातील समस्या सुद्धा विशद केल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, उपाध्यक्ष रमेश पारधी, जिल्हा परिषद सदस्य हरेंद्र राहांगडाले, सुरेश राहांगडाले, तुमसरचे पचायत समितीचे सभापती कलाम शेख यांची समयोचित भाषणे झाली. गावात प्रवेश करताच मान्यवरांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक, महिला, विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

खडसेंच्या बंगल्यावर आता शिंदेंचा मुक्काम

0

नागपूर : गत हिवाळी अधिवेशनाच्या काळात युतीतर्फे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यात आघाडीवर असलेले तत्कालीन विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे या दोन्ही नेत्यांची या अधिवेशनातील भूमिका मात्र परस्परांच्या विरोधात असणार आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या बंगल्यात खडसे यांचा मुक्काम राहात होता त्याच बंगल्यात बसून शिंदे आता विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या विरोधात रणनीती आखतील.

विरोधी पक्ष नेत्याच्या बंगल्याचे हस्तांतरण अशा प्रकारे. एका एकनाथाकडून दुसऱ्या एकनाथाकडे या निमित्ताने होण्याचे चित्र पाहायला मिळेल. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचे परिणामही नागपूर अधिवेशनात पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत विरोधी बाकावर बसणारा भाजप यावेळी सत्ताधारी पक्ष असला तरी त्यांचा मित्र पक्ष मात्र सत्तेच्या बाहेर आहे. विशेष म्हणजे तो प्रमुख विरोधी पक्ष आहे. आघाडी सरकारच्या काळात एकनाथ खडसे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. ते अधिवेशनाच्या एक दिवस आधी त्यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना बोलवून सरकार विरोधात रणशिंग फुंकायचे. त्यावेळी मित्रपक्षाचे प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदेही तेथे उपस्थित असत. या अधिवेशनात अगदी याविरोधात चित्र पाहायला मिळेल. खडसे आणि शिंदे यांचा मुक्काम एकाच परिसरात (रविभवन परिसर) राहणार असला तरी भूमिका वेगवेगळ्या असतील. खडसे यांना मंत्री म्हणून वेगळा बंगला मिळेल तर शिंदे यांना आतापर्यंत खडसेंना मिळणारा विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला मिळेल त्यामुळे गत पाच वर्षात ज्या बंगल्यात खडसेंच्या उपस्थितीत सरकार विरोधात लढण्याची व्यूव्हनीती ठरत होती आता त्याच बंगल्यात शिंदेंच्या उपस्थितीत भाजप सरकारला खिंडीत पकडण्यासाठी डावपेच आखले जाण्याची शक्यता आहे.

सुनील मनोहर राज्याच्या महाअधिवक्तापदी

0

मुंबई – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत सहकारी संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू असून “अ‘ आणि “ब‘ प्रकारच्या संस्थांच्या निवडणुका जून 2015 पर्यंत पूर्ण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. “क‘ आणि “ड‘ प्रकारातील संस्थांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 31 डिसेंबर 2014 पर्यंत पूर्ण करण्यात येतील.

सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत “क‘ आणि “ड‘ प्रकारातील 15,159 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असून ही प्रक्रिया डिसेंबर 2014 पर्यंत चालणार आहे. “अ‘ आणि “ब‘ प्रकारातील 4022 सहकारी संस्थांची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, या संस्था मोठ्या असल्याने त्यांच्या निवडणुकीसाठी जास्त मनुष्यबळ लागणार आहे. एकाच वेळी सर्व प्रकारातील संस्थांच्या निवडणुका घेणे शक्‍य नसल्याने सहकार विभागाने “अ‘ आणि “ब‘ संस्थांच्या निवडणुका जून 2015 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रस्ताव मांडला. यासंदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये आवश्‍यक ती सुधारणा करण्यात येईल.
राज्याच्या महाअधिवक्तापदी ज्येष्ठ वकील सुनील व्यंकटेश मनोहर यांची नियुक्ती करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सध्याचे महाअधिवक्ता दरायस जहॉंगीर खंबाटा यांचा राजीनामा स्वीकारण्याची शिफारस राज्यपालांना करण्यात येणार आहे.

सुनील मनोहर हे ज्येष्ठ विधिज्ञ असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये एक नामांकित वकील म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. ऍड. दरायस खंबाटा यांनी महाअधिवक्ता म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत त्यांचे अभिनंदनही केले.

न्यायाधीशांची 179 पदे निर्माण करणार
राज्यात न्यायाधीशांची 179, त्याचप्रमाणे त्यांना साहाय्य करण्यासाठी 751 कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने ब्रिजमोहन विरुद्ध “युनियन ऑफ इंडिया‘ या याचिकेच्या अनुषंगाने प्रत्येक राज्यातील कार्यरत असलेल्या न्यायाधीशांच्या पदांच्या 10 टक्के पदे आणि आवश्‍यक कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करावी असा निर्णय दिला आहे. राज्यात सध्या न्यायाधीशांची 1,781 पदे असून त्याच्या 10 टक्के म्हणजे 179 पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. या पदांसाठी 48 कोटी 41 लाख इतका खर्च अपेक्षित असून, त्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

सगळे गुजराती लबाड!: मुलायम

0

लखनऊ-राजकारणापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष’नेताजी’ मुलायम सिंह यादव यांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मुलायम यांनी समस्त गुजराती समाजावरच लबाडीचा शिक्का मारला आहे. ‘सगळे गुजराती लबाड असतात. त्यांना खोटं बोलायची सवयच असते,’ असा आरोप त्यांनी केला आहे.

लखनऊ येथे झालेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय महिला परिषदेत मुलायम सिंह बोलत होते. यावेळी मुलायम सिंह यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आश्वासने, स्वच्छ भारत अभियान, महिला सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर बिनधास्त भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना त्यांचा तोल सुटला. ‘नरेंद्र मोदी यांचे विकासाची वचने खोटी आहेत. आश्वसाने पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत आणि जो शब्द पाळत नाही तो माझ्या दृष्टीने भ्रष्टाचारीच आहे,’ असा टोलाही त्यांनी हाणला. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरूनही मुलायम सिंह यांनी मोदी यांच्यावर विषारी टीका केली. महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या मोदींची पत्नी कुठे आहे? तिचा शोध कोण लावणार? असा तिखट प्रश्न त्यांनी केला.

गरीबांच्या घरात जास्त घाण
‘स्वच्छ भारत’ मोहिमेविषयी बोलताना आपण काय बोलत आहोत, याचे भानही मुलायम यांना नव्हते. ते म्हणाले, ‘श्रीमंतांची घरं स्वच्छ असतात. गरीबांच्या घरात जास्त घाण असते. त्यामुळं खरी स्वच्छता झाडूने होणार नाही. गरीबी गेली तर आपोआपच भारत स्वच्छ होईल.’

सीता कुठे पदर घ्यायची?
महिलांमधील बुरखा व पडदा पद्धती बंद झाली पाहिजे, असं सांगताना मुलायम रामायण व महाभारतापर्यंत पोहोचले. ते म्हणाले, ‘पडदा पद्धती महिलांच्या प्रगतीसाठी मारक आहे. प्राचीन काळी ही पद्धत नव्हती. सीता आणि द्रौपदी कुठं पदर घ्यायच्या? त्या कोणत्या पडद्यामागे राहिल्या होत्या? मधल्या काळात बदललेल्या परिस्थितीमुळं महिलांना पडद्यामागं जावं लागलं,’ असं ते म्हणाले.

राज्य सरकारची ‘महा ई-लॉकर’ सुविधा

0

मुंबई-नोकरीसाठीच्या मुलाखती, बँकेसंबधी कामे किंवा अन्य कारणांसाठी आपली महत्त्वाची कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत घेऊन फिरावी लागतात. कधी कधी तर, एखादे महत्त्वाचे कागदपत्र ऐनवेळी घरीच विसरण्याचीही नामुष्की ओढावते. त्यामुळे कागदपत्रे सोबत घेऊन फिरण्याची ही कटकट संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यसरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने ‘महा ई-लॉकर’ नावाचा एक उपयुक्त पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. ई-लॉकर सुविधा ही आधार कार्डशी संलग्न करण्यात आली आहे. आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
‘महा ई-लॉकर’ म्हणजे नेमके काय?
राज्य सरकारने ‘महा ई लॉकर’ ही सुविधा पूर्णपणे मोफत सुरू केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून जन्माचा दाखला, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्रे ई लॉकरमध्ये अपलोड करता येतात. आपल्याला हवी ती कागदपत्रे आपण अपलोड करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता सॉफ्ट कॉपी आपल्या लॉकर मध्ये अपलोड केली जाईल. मात्र, या ई-लॉकरसाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
या ई-लॉकरमुळे कधीही, कुठेही आपली महत्त्वाची कागदपत्रे हवी असतील, तर त्यावेळी फक्त आधार नंबर दिल्यास, आपल्या मोबाईल नंबरवर पासवर्ड येईल, तो टाकल्यास हवी ती कागदपत्रे डाऊनलोड करता येतील
१. elocker.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. इथे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकून ‘साइन अप’ करा.
२. यानंतर तुम्ही आधार कार्डवेळी जो मोबाईल नंबर रजिस्टर केला आहे, त्या नंबरवर एक ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) येईल. तो पासवर्ड अर्ध्यातासापर्यंत वापरता येईल, अन्यथा परत लॉगिन करावं लागेल. हा पासवर्ड टाकून ‘व्हॅलिडेट ओटीपी’ वर क्लिक करा.
३. या प्रक्रियेनंतर तुम्हाला ६ अंकी पिन तयार करावा लागतो. हा पिन कायमस्वरुपी असतो.
४. तुम्ही तयार केलेला पिन टाकून ‘व्हॅलिडेट पिन’वर क्लिक करा. तुमचा ‘महा डिजिटल लॉकर’ तयार होईल

पवार बोलतात ते कधीच करत नाहीत- उध्दव ठाकरे

0

मुंबई-शरद पवारांवर आम्ही विश्वास ठेवत नाही. पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि करतात ते बोलत नाहीत असा इतिहास आहे, अशा खोचक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य करणारे पवार आज मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार राहण्याचे विधान करतात. त्यामुळे पवार कधी काय बोलतात हे त्यांच्याच लक्षात राहत नाही. मतदार राजा पवार साहेबांना माफ कर, पवार काय करतात आणि काय बोलतात हे त्यांना कळत नाही, असा उपरोधिक टोला उध्दव यांनी पवारांना लगावला तर, ज्यांच्याबरोबर गेली २५ वर्षे राहिलो ते या निवडणुकीत आमच्या विरोधात लढले आणि आम्ही ज्यांच्या विरोधात होतो त्यांना ते सोबत घेत आहेत. त्यामुळे दुर्देवाने कोण कोणाबरोबर आहे ते कळतच नाही, अशी उध्दव यांनी भाजपवर टीका केली.

पुन्हा निवडणुका होऊ शकतात: पवार

0

पुन्हा निवडणुका होऊ शकतात: पवार

अलिबाग: ‘विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे ते सरकार बनवू शकत नाहीत; शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र येण्याचेही घडत नाही; ते होत नसल्याने सरकार बनत नाही. अशा परिस्थितीमध्ये दोन पर्याय असू शकतात. एक म्हणजे पाच-सहा महिन्यांसाठी पुन्हा राज्यपालांची राजवट लागू होऊ शकते आणि त्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीच्या मार्गाने जाण्याची शक्‍यता निर्माण होऊ शकते,‘ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) व्यक्त केले. अलिबागमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन दिवसांचे अधिवेशन सुरू आहे.त्यावेळी बोलत होते.या अधिवेशऩात आमदार खासदारांना मागर्दशर्न करण्यात येत आहे.याप्रसंगी मंचावर राज्यसभा खासदार प्रफुल पटेल,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,दिलीप बऴसे पाटील यांच्या राष्ट्रवादीचे सवर् नेते उपस्थित होते.