आश्रमशाळेतील चतूर्थश्रेणी कर्मचारी करणार आत्मदहन

0
17

दोन वर्षापासून समायोजन रखडले : प्रधान सचिवाला पाठविले पत्र
गोंदिया,दि.२७ : देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाèया जिल्ह्यातील दोन अनुदानित आश्रमशाळा शासनाने बंद केल्या. याला दोन वर्ष लोटली. परंतु, अद्याप चतूर्थश्रेणी कर्मचाèयांचे समायोजन केले नाही. त्यामुळे जगावे तरी कसे? असा पोटतिडकीचा प्रश्न उपस्थित करीत कर्मचाèयांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. १ जूनला देवरीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे पत्रही त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवाला पाठविले आहे.आत्मदहन करणाèया कर्मचाèयामध्ये सौ.एस.डब्ल्यू.चाचेरे,व्ही.बी. गुरूमार्गी,व्ही.एल.वाघमारे,ए.पी.शहारे,आर.एस.कुंभरे,जी.एस.फुंडे,ए.पी.मेश्राम,एल.एम.बावणे, एल.जी.करसाल,एम.एस.वानखेडे,ए.पी.टेकाम,यू. जी. गोरले यांचा समावेश राहणार आहे.
सडक अर्जुनी व दोडके जांभळी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जात होत्या. दोन वर्षापूर्वी शासनाने या शाळांची मान्यता काढली. अनुदान बंद केले.त्यामुळे दोन्ही शाळा बंद झाल्या. या शाळांतील १२ चतूर्थश्रेणी कर्मचाèयांचे समायोजन रखडले आहे. नियमानुसार समायोजन होईपर्यंत वेतन देणे गरजेचे आहे.मात्र तसे झाले नाही. तथापि, दोन वर्र्षापासून वेतन न मिळाल्याने कर्मचाèयांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले. दैनंदिन गरजा पूर्ण करता येत नाही. उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर रूप धारण करू लागला. वयात आलेल्या मुलामुलींच्या लग्नाच्या विचाराने मन सैरभैर झाले. यातच आपले समायोजन करावे, म्हणून या कर्मचाèयांनी आदिवासी विकास विभागाला अनेकदा पत्रव्यवहार केला. उपोषण, आंदोलने केलीत. परंतु, कोणालाही पाझर फुटला नाही. शेवटी हताश झालेल्या या कर्मचाèयांनी ३१ मे पर्यंत समायोजन करा, अन्यथा १ जून रोजी देवरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा दिला. या आशयाचे पत्र त्यांनी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवाला पाठविले असून शासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.