सरकारने दिली न्यायालयासमोर परीक्षा कालावधीत अखंड वीजपुरवठा करण्याची हमी

0
10

मुंबई – बारावीच्या परीक्षा केंद्रांना परीक्षा कालावधीत अखंड वीजपुरवठा करण्याची हमी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने दिली आहे. येत्या शनिवारपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत, असून राज्यातील १२५ परीक्षा केंद्रांमध्ये वीजपुरवठा होत नसल्याची धक्कादायक बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.

नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी या प्रकरणी जनहित याचिका दाखल केली होती. दहावी व बारावी परीक्षा केंद्रांना विनाखंडीत वीज पुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयाने याची दाखल घेत परीक्षा केंद्रांना अखंड वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने गवळी यांनी न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत शासनाने वरील हमी दिली आहे.