चुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू

0
10

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : गडचिरोली जिल्ह्यातील  हेमलकसा येथून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आणलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झाला आहे. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचे वन्यजीव विभागातील सुत्रांचे म्हणने आहे. आधीच आमटे कुटुंबीय आणि साथीदार राजापासून दुरावलेली रेणू आता बछड्यांच्या मृत्यूनं आणखी दुखावली आहे. या बछड्यांच्या मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.रेणू नावाच्या या मादी बिबट्याने मंगळवारी तीन गोंडस पिल्लांना जन्म दिला होता. पण या तिन्ही बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.